अ‍ॅपशहर

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी परवड

म टा प्रतिनिधी, औरंगाबाद राज्यातील शाळांमधील हजारो अल्पसंख्याक विद्यार्थी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरले...

Maharashtra Times 23 Aug 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील शाळांमधील हजारो अल्पसंख्याक विद्यार्थी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरले. मात्र, त्यांना शिष्यवृत्तीच मिळालेली नाही. २००९-१० शैक्षणिक वर्षापासूनचे हे विद्यार्थी आहेत. बँक खात्यांची संबंधित शाळांकडून माहितीच दिली जात नाही. ९८ हजार ५०८ पैकी २९ हजार २१२ विद्यार्थ्यांचे बँक, आधार नंबरच नाहीत. शिक्षण विभाग व शाळांच्या अनास्थेमुळे योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला नाही.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चास हातभार लागावा या हेतुने शासनाकडून प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या अपुऱ्या माहितीमुळे शिष्यवृत्तीपासूनच हजारो विद्यार्थी वंचित आहेत. शाळांकडून पुरविण्यात येणारी माहिती अपुरी असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने शाळांवर ठपका ठेवत, परिपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती शाळा पुरवित नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती अपुरी असल्याचे समोर आले आहे. २००९-१०, २०१०-११, २०११-१२ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील हे विद्यार्थी असून याचे यांची शिष्यवृत्तीच मिळालेली नाही. ९८ हजार ५०८ विद्यार्थी असून त्यापैकी ६९ हजार २९६ विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील उपलब्ध झाला आहे. तर तब्बल २९ हजार २१२ विद्यार्थ्यांचे बँक, आधार क्रमांक शाळांकडून दिले गेलेले नाहीत. यासह आठ हजार ८५ विद्यार्थ्यांचे बँक खाते चुकीचे असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शाळांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही शाळांनी प्रक्रियाच पूर्ण केलेली नाही. ज्यांची माहिती परिपूर्ण आहे, अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावरही शासनाने अद्याप शिष्यवृत्ती जमा केलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती केव्हा मिळणार हा प्रश्नही कायम आहे. शाळा व्यवस्थापानाच्या बेजबाबदारपणामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. यातील अनेक विद्यार्थी शालेय शिक्षण पूर्ण करून बाहेरही पडले. मात्र, त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अपुरी माहिती देणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

\Bशाळांना प्रत्यक्ष भेट देण्याचे आदेश \B

परिपूर्ण माहिती देण्याच्या सूचना देऊनही शाळांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता, परिपूर्ण माहिती भरण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. मुख्याध्यापकांशी संपर्क साधून किंवा प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करा, अशा सूचना अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

एकूण विद्यार्थी ९८५०८

पूर्ण माहिती असलेले विद्यार्थी ६९२९६

अपूर्ण माहिती असलेले विद्यार्थी २९२१२

चूक बँक खाते असलेले विद्यार्थी ८०८५

..

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज