लातूर : लातूरला जपानमधील मियावोकी चळवळ राबविणे आवश्यक असल्याचे मत ग्रीन लातूर वृक्ष टीमचे समन्वय डॉ.पवन लड्डा यांनी केले.
नेहरू युवा केंद्रातर्फे 'स्वच्छ ग्राम हरित ग्राम' या विषयावर जिल्ह्यातील युवक मंडळातील सर्व सदस्यांसाठी बुधोडा येथील प्रशिक्षण कार्यक्रम झाला. त्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय गवई, प्रशासनिक अधिकारी संजय ममदापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लड्डा म्हणाले की, प्रत्येकाने आपले गाव स्वच्छ आणि हरित करण्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. पूर्वी आपण वृक्षारोपण करताना दोन झाडांमध्ये अंतर ठेवायचो, परंतु आज मियावोकी संकल्पनेद्वारे झाडांची शृंखला आपण तयार केली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात आपण ग्रीन कव्हर करणे गरजेचे आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून लातूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे आजपर्यंत ६४८ दिवस ५१,८०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. रोज पाच ते सहा टँकरद्वारे झाडाला पाणी देण्याचे काम सुरू आहे. घर, मंदिर, स्मशानभूमी व गाव अशा अनेक ठिकाणी आपण प्राधान्याने वृक्षारोपण केले पाहिजे असे ते म्हणाले.
डॉ. गवई यांचेही भाषण झाले. अध्यक्षीय समारोप सुडे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक विकास काळे यांनी केले तर, आभार इम्रान पटेल यांनी मानले.
नेहरू युवा केंद्रातर्फे 'स्वच्छ ग्राम हरित ग्राम' या विषयावर जिल्ह्यातील युवक मंडळातील सर्व सदस्यांसाठी बुधोडा येथील प्रशिक्षण कार्यक्रम झाला. त्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय गवई, प्रशासनिक अधिकारी संजय ममदापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लड्डा म्हणाले की, प्रत्येकाने आपले गाव स्वच्छ आणि हरित करण्यासाठी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. पूर्वी आपण वृक्षारोपण करताना दोन झाडांमध्ये अंतर ठेवायचो, परंतु आज मियावोकी संकल्पनेद्वारे झाडांची शृंखला आपण तयार केली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात आपण ग्रीन कव्हर करणे गरजेचे आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून लातूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे आजपर्यंत ६४८ दिवस ५१,८०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. रोज पाच ते सहा टँकरद्वारे झाडाला पाणी देण्याचे काम सुरू आहे. घर, मंदिर, स्मशानभूमी व गाव अशा अनेक ठिकाणी आपण प्राधान्याने वृक्षारोपण केले पाहिजे असे ते म्हणाले.
डॉ. गवई यांचेही भाषण झाले. अध्यक्षीय समारोप सुडे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक विकास काळे यांनी केले तर, आभार इम्रान पटेल यांनी मानले.