औरंगाबाद: मनसेचे नेते व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातून निवृत्ती घेताना त्यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. जाधव यांचा हा निर्णय मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
'भाजपनं दुहीची बीजे पेरली, जनता विसरणार नाही'
सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून जाधव यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. 'लॉकडाऊनमध्ये इतरांप्रमाणेच मी वाचनाचा छंद जोपासतोय. अध्यात्मिक वाचन करतोय. हे सगळं करत असताना मला काही गोष्टींची जाणीव झाली. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत असं वाटू लागलं. त्यातून मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'यापुढं संजना ही माझी राजकीय उत्तराधिकारी असेल. कोणालाही कुठल्याही प्रकारचे प्रश्न वा अडचणी असतील तर त्यांनी संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्याव्यात,' असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
हर्षवर्धन जाधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. जाधव यांनी तडकाफडकी घेतलेल्या आताच्या निर्णयाला कौटुंबिक वाद कारण असल्याचं बोललं जातं. खुद्द जाधव यांनी व्हिडिओमध्ये ते मान्य केलंय. 'प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. तशा आमच्याही घरात झाल्या. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. मी संजनाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्राचे नेते रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चितच उत्तुंग भरारी घेईल,' असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवारांच्या 'या' छोट्या सूचना तुमच्यासाठी मोठ्या उपयोगाच्या
'भाजपनं दुहीची बीजे पेरली, जनता विसरणार नाही'
सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून जाधव यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. 'लॉकडाऊनमध्ये इतरांप्रमाणेच मी वाचनाचा छंद जोपासतोय. अध्यात्मिक वाचन करतोय. हे सगळं करत असताना मला काही गोष्टींची जाणीव झाली. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत असं वाटू लागलं. त्यातून मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'यापुढं संजना ही माझी राजकीय उत्तराधिकारी असेल. कोणालाही कुठल्याही प्रकारचे प्रश्न वा अडचणी असतील तर त्यांनी संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्याव्यात,' असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
हर्षवर्धन जाधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. जाधव यांनी तडकाफडकी घेतलेल्या आताच्या निर्णयाला कौटुंबिक वाद कारण असल्याचं बोललं जातं. खुद्द जाधव यांनी व्हिडिओमध्ये ते मान्य केलंय. 'प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. तशा आमच्याही घरात झाल्या. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. मी संजनाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्राचे नेते रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चितच उत्तुंग भरारी घेईल,' असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवारांच्या 'या' छोट्या सूचना तुमच्यासाठी मोठ्या उपयोगाच्या