औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. त्यानंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. "जो बूँद से गयी वो हौद से नही आती" असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारचे कपडे उतरले आहेत, आता लंगोट वाचवायचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीनगर नामांतरावर मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केली आहे. "जो बूँद से गयी वो हौद से नही आती, सरकारचे पूर्ण कपडे उतरल्यानंतर लंगोट वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. आजपर्यंत अडीच वर्षात झालेल्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर करा हा प्रस्ताव का ठेवला गेला नाही? हा महत्त्वाचा मुद्दा आहे" असं खांबेकर म्हणाले.
शिवसेनेला हे माहीत आहे की, आता आपण सत्ता गमावलेली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता देखील शिवसेनेच्या विरोधात आहे, त्यामुळे किमान काही तरी केल्याचा हा प्रयत्न आहे, असंही मनसेने म्हटलं आहे.
हेही वाचा : अडीच वर्ष खूप चांगलं सहकार्य केलं, काही चुकलं असेल तर माफ करा : उद्धव ठाकरे
दरम्यान, औरंगाबादशिवाय उस्मानाबाद शहराचे नावही धाराशिव केले जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला. या दोन्ही शहरांच्या नामांतराबाबत शिवसेनेच्या बहुप्रतीक्षित मागण्यांना अखेर कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासह दहा निर्णय मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतरासह अनेक निर्णयांचा सपाटा लावला. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली.
हेही वाचा : छत्रपतींच्या नावाला विरोध कसला करायचा? नामांतराला काँग्रेसचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचं कौतुक
काँग्रेसच्या विरोधामुळे लांबणीवर
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा कायमच करत आले आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे नामांतरणाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसचा या निर्णयाला विरोध असल्यामुळे नामांतराचा निर्णय लांबणीवर पडला होता.
हेही वाचा : औरंगाबाद आता संभाजीनगर, नामांतराचा मार्ग मोकळा, कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर
शिवसेनेला हे माहीत आहे की, आता आपण सत्ता गमावलेली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता देखील शिवसेनेच्या विरोधात आहे, त्यामुळे किमान काही तरी केल्याचा हा प्रयत्न आहे, असंही मनसेने म्हटलं आहे.
हेही वाचा : अडीच वर्ष खूप चांगलं सहकार्य केलं, काही चुकलं असेल तर माफ करा : उद्धव ठाकरे
दरम्यान, औरंगाबादशिवाय उस्मानाबाद शहराचे नावही धाराशिव केले जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला. या दोन्ही शहरांच्या नामांतराबाबत शिवसेनेच्या बहुप्रतीक्षित मागण्यांना अखेर कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासह दहा निर्णय मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतरासह अनेक निर्णयांचा सपाटा लावला. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली.
हेही वाचा : छत्रपतींच्या नावाला विरोध कसला करायचा? नामांतराला काँग्रेसचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचं कौतुक
काँग्रेसच्या विरोधामुळे लांबणीवर
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा कायमच करत आले आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे नामांतरणाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसचा या निर्णयाला विरोध असल्यामुळे नामांतराचा निर्णय लांबणीवर पडला होता.
हेही वाचा : औरंगाबाद आता संभाजीनगर, नामांतराचा मार्ग मोकळा, कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर