औसा, लातूरः उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी औसामधील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्रातील काँग्रेसमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसची पाळमुळं रुजली आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा यामुळे राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. पण राहुल गांधी यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य करत औसातील पहिली प्रचारसभा दणकावून सोडली.
गेल्या काही वर्षात देशातील उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. कर्ज फेडंल नाही तर शेतकऱ्याला तुरुंगात टाकलं जातं. शेतकऱ्यांचा पैसा उद्योगपतींच्या खिशात घातला. अदानी, अंबानीचं कर्ज माफ केलं गेलं. पण दुष्काळ आणि नापिकमुळे पिचलेल्या शतकऱ्याचं कर्ज या सरकारला माफ करता आलं नाही. कर्जमाफीचा इतका गाजावाजा केला गेला. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
विरोधकांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न
एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल तर दुसरीकडे नोकरी नाही म्हणून तरुण बेरोजगार. ४० वर्षातील सर्वातं मोठी बेरोजगारी भारतात निर्माण झाली आहे. मोदींनी देशाचं वाटोळं केलंय. चंद्रावर रॉकेट पाठवून तरुणाचं पोट भरणार नाही. त्याला रोजगार द्या, असा हल्ला राहुल गांधींनी चढवला. नोटाबंदीवरून लक्ष हटवण्यासाठी चांद्रयान आणि कलम ३७० चे मुद्दे रेटले जात आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला.
भारत-चीन संबंधांचे नवे युग
इस्रोची स्थापना काँग्रेसनं केली. इस्रोचा विकास केला. पण आता त्याचं श्रेय मोदी घेत आहेत. मेक इन इंडिया नव्हे तर मेड इन चायना म्हणण्याची वेळ आली आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. गुजरातमधील कापड उद्योग, हिरे व्यापारी मंदीच्या गर्तेत सापडले आहेत. पण त्यांच्याबद्दल माध्यमांमध्ये एक शब्दही लिहून येत नाही, इतकी या सरकारने गळचेपी केलीय, असं राहुल गांधी म्हणाले.
फोर्ब्सः सर्वात श्रीमंत 'टॉप-५' यादीत ४ गुजराती
लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा यामुळे राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. पण राहुल गांधी यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य करत औसातील पहिली प्रचारसभा दणकावून सोडली.
गेल्या काही वर्षात देशातील उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. कर्ज फेडंल नाही तर शेतकऱ्याला तुरुंगात टाकलं जातं. शेतकऱ्यांचा पैसा उद्योगपतींच्या खिशात घातला. अदानी, अंबानीचं कर्ज माफ केलं गेलं. पण दुष्काळ आणि नापिकमुळे पिचलेल्या शतकऱ्याचं कर्ज या सरकारला माफ करता आलं नाही. कर्जमाफीचा इतका गाजावाजा केला गेला. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
विरोधकांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न
एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल तर दुसरीकडे नोकरी नाही म्हणून तरुण बेरोजगार. ४० वर्षातील सर्वातं मोठी बेरोजगारी भारतात निर्माण झाली आहे. मोदींनी देशाचं वाटोळं केलंय. चंद्रावर रॉकेट पाठवून तरुणाचं पोट भरणार नाही. त्याला रोजगार द्या, असा हल्ला राहुल गांधींनी चढवला. नोटाबंदीवरून लक्ष हटवण्यासाठी चांद्रयान आणि कलम ३७० चे मुद्दे रेटले जात आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला.
भारत-चीन संबंधांचे नवे युग
इस्रोची स्थापना काँग्रेसनं केली. इस्रोचा विकास केला. पण आता त्याचं श्रेय मोदी घेत आहेत. मेक इन इंडिया नव्हे तर मेड इन चायना म्हणण्याची वेळ आली आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. गुजरातमधील कापड उद्योग, हिरे व्यापारी मंदीच्या गर्तेत सापडले आहेत. पण त्यांच्याबद्दल माध्यमांमध्ये एक शब्दही लिहून येत नाही, इतकी या सरकारने गळचेपी केलीय, असं राहुल गांधी म्हणाले.
फोर्ब्सः सर्वात श्रीमंत 'टॉप-५' यादीत ४ गुजराती