म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्यासात महिन्यांत सात हजार ८६५ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ३९ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त म्हणजे दोन हजार ७९३ नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला.
करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. त्यात मास्कचा वापर हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरला तर करोना विषाणू संसर्ग बऱ्याच प्रमाणात थांबवता येणे शक्य आहे. त्यामुळे महापालिकेने मास्क न बांधणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार केली. या पथकांच्या माध्यमातून दररोज कारवाई केली जात आहे. मे महिन्यापासून ही कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यात येत आहे. एक मे ते २२ नोव्हेंबर यादरम्यान म्हणजे सुमारे सात महिन्यांत महापालिकेने सात हजार ८६५ व्यक्तींवर विनामास्क फिरल्याबद्दल प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला आहे. सात महिन्यांच्या काळात तब्बल ३९ लाख ३२ हजार ५०० रुपये रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात ५४ व्यक्तींना दंड करण्यात आला. जून महिन्यात एक हजार ६७६, जुलै महिन्यात २६६, ऑगस्ट महिन्यात ८८, सप्टेबर महिन्यात दोन हजार ५६९, ऑक्टोबर महिन्यात दोन हजार ७९३ तर नोव्हेंबर महिन्यात २२ तारखेपर्यंत ४१९ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्यासात महिन्यांत सात हजार ८६५ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ३९ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त म्हणजे दोन हजार ७९३ नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला.
करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. त्यात मास्कचा वापर हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरला तर करोना विषाणू संसर्ग बऱ्याच प्रमाणात थांबवता येणे शक्य आहे. त्यामुळे महापालिकेने मास्क न बांधणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार केली. या पथकांच्या माध्यमातून दररोज कारवाई केली जात आहे. मे महिन्यापासून ही कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यात येत आहे. एक मे ते २२ नोव्हेंबर यादरम्यान म्हणजे सुमारे सात महिन्यांत महापालिकेने सात हजार ८६५ व्यक्तींवर विनामास्क फिरल्याबद्दल प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला आहे. सात महिन्यांच्या काळात तब्बल ३९ लाख ३२ हजार ५०० रुपये रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात ५४ व्यक्तींना दंड करण्यात आला. जून महिन्यात एक हजार ६७६, जुलै महिन्यात २६६, ऑगस्ट महिन्यात ८८, सप्टेबर महिन्यात दोन हजार ५६९, ऑक्टोबर महिन्यात दोन हजार ७९३ तर नोव्हेंबर महिन्यात २२ तारखेपर्यंत ४१९ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.