अ‍ॅपशहर

आईनेच पोटच्या दोन मुलांचा जीव घेतला, औरंगाबादमधील धक्कादायक घटना; मुलं झोपेत असताना...

Aurangabad News : औरंगाबादमध्ये रात्रीत मोठी घटना घडली आहे. पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. महिलेले आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या केल्यचा आरोप आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2023, 8:43 am
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आईने मुलांची हत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad crime news
आईनेच पोटच्या दोन मुलांचा जीव घेतला, औरंगाबादमधील धक्कादायक घटना; मुलं झोपेत असतानाच...


आपल्या दोन अल्पवयीन मुलांचा ते झोपेत असताना आईनेच त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सादात नगरच्या गल्ली नंबर तीनमध्ये ही घटना घडली आहे. दोन मुलं बेशुद्ध असल्याची माहिती पोलिसांना काल रात्री मिळाली होती. कुटुंबीयांना त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेलं. पण त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. अदिबा फहाद बसरावी (वय -६ वर्षे), अली फहाद बसरावी (वय -४ वर्षे) (दोन्ही राहणार सादातनगर, औरंगाबाद) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर आलीया फहाद बसरावी (वय - २२ वर्ष (रा. सादातनगर, गल्ली नंबर-३,रेल्वे स्टेशन परिसर) असे हत्या करणाऱ्या निर्दयी आईचे नाव आहे.

कारमध्ये साडे आठ लाखांची लाच स्वीकारणं महागात, अधिकारी रंगेहाथ सापडला,औरंगाबादमध्ये खळबळ

सोमवारी सकाळी लवकर शाळेत जायचे असल्याने रविवारी रात्री आदीबा आणि आली दोघानी नित्याप्रमाने घरच्यासह जेवण केले व दोघेही झोपी गेले. मात्र सकाळी ते त्यांच्या खोलीतून बाहेर आलेच नाही. आई आलिया देखील त्याच खोलीत होत्या. दुपारी १२ वाजता आलिया या घराबाहेर आल्या तेंव्हा दोन्ही मुलं खोलीत बेशुद्धअवस्थेत खोलीत पडलेले घरच्यांना दिसले. घरच्यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात हलविले. मात्र दुपारी दीड वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. दिवसभर या प्रकरणी नातलगांना कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, शविच्छेदनानंतर प्राथमिक अहवाल प्राप्त झाला तेंव्हा सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. दोघांचा मृत्यू नका तोंड दाबल्याने झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी कुटुंबातील अनेक व्यक्तींची चौकशी केली.

औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलात 'बदली'चे आदेश; वाचा कुणाची कुठे झाली बदली

दरम्यान, रात्री उशिरा या घटनेची माहिती समोर आली. झोपेत असलेल्या मुलांची आईनेच कापडाने नाक तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर ती तेथेच मृतदेहाजवळ दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत बसली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून निर्दयी आईला अटक केली आहे. मात्र, पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या आईने का केली? याचे कारण समोर आलेले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाचे लेख