म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सरकारी नोकरीसाठी वर्यामर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला, परंतु राज्य लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदाच्या पूर्व परीक्षेसाठी जुनीच वयोमर्यादा ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांत संतापाची लाट पसरली आहे.
आयोगाने बुधवारी ‘पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६’ची जाहिरात प्रसिद्ध केली. एकूण ७५० जागांसाठी ही जाहिरात दिली. या जाहिरातीत वाढीव वर्यामर्यादेबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षात अधिकाधिक तरुणांना स्थान मिळावे म्हणून सरकारने वयोमर्यादेत वाढ केली. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ३३वरून ३८ वर्षांपर्यंत आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ४३ वर्षे केली. शासनाने वयोमर्यादा वाढवूनही, राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत खुल्या प्रवर्गातील गटातील विद्यार्थ्यांचे वय ‘किमान १९ ते कमाल २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे’ असे स्पष्ट करण्यात आले आहे. तीन वर्षांनंतर आलेली जाहिरात आणि त्यातही वयोमर्यादा पूर्वीचीच, त्यामुळे दोन-तीन वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची मेहनत या निर्णयामुळे वाया जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अशा हजारो विद्यार्थ्यांमध्ये आयोगाच्या या जाहिरातीवर संताप व्यक्त होत आहे.
७५० जागा भरणार
आयोगाने एकूण ७५० जागांसाठी ही जाहिरात दिली आहे. त्यात खुल्या प्रवर्गातील सर्वाधिक ५६६, सर्वसाधारण ३६८, महिला १७० तर खेळाडूंसाठी २८ जागांचा समावेश आहेत. अनेक वर्षांनंतर आयोगाने एवढ्या मोठ्या भरतीसाठी जाहिरात दिली.
मी तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करतो आहे. यावर्षी वयामुळे अपात्र ठरणार होतो. शासनाने वयोमर्यादा वाढविल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या, पण आयोगाच्या जाहिरातीत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा २८ वर्षे दर्शविण्यात आली आहे.
- दिगंबर वैद्य, विद्यार्थी.
सरकारी नोकरीसाठी वर्यामर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला, परंतु राज्य लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पदाच्या पूर्व परीक्षेसाठी जुनीच वयोमर्यादा ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांत संतापाची लाट पसरली आहे.
आयोगाने बुधवारी ‘पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६’ची जाहिरात प्रसिद्ध केली. एकूण ७५० जागांसाठी ही जाहिरात दिली. या जाहिरातीत वाढीव वर्यामर्यादेबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षात अधिकाधिक तरुणांना स्थान मिळावे म्हणून सरकारने वयोमर्यादेत वाढ केली. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ३३वरून ३८ वर्षांपर्यंत आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ४३ वर्षे केली. शासनाने वयोमर्यादा वाढवूनही, राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत खुल्या प्रवर्गातील गटातील विद्यार्थ्यांचे वय ‘किमान १९ ते कमाल २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे’ असे स्पष्ट करण्यात आले आहे. तीन वर्षांनंतर आलेली जाहिरात आणि त्यातही वयोमर्यादा पूर्वीचीच, त्यामुळे दोन-तीन वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची मेहनत या निर्णयामुळे वाया जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अशा हजारो विद्यार्थ्यांमध्ये आयोगाच्या या जाहिरातीवर संताप व्यक्त होत आहे.
७५० जागा भरणार
आयोगाने एकूण ७५० जागांसाठी ही जाहिरात दिली आहे. त्यात खुल्या प्रवर्गातील सर्वाधिक ५६६, सर्वसाधारण ३६८, महिला १७० तर खेळाडूंसाठी २८ जागांचा समावेश आहेत. अनेक वर्षांनंतर आयोगाने एवढ्या मोठ्या भरतीसाठी जाहिरात दिली.
मी तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करतो आहे. यावर्षी वयामुळे अपात्र ठरणार होतो. शासनाने वयोमर्यादा वाढविल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या, पण आयोगाच्या जाहिरातीत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा २८ वर्षे दर्शविण्यात आली आहे.
- दिगंबर वैद्य, विद्यार्थी.