अ‍ॅपशहर

मुद्रा लोनच्या वसुलीची बँकांना चिंता

मराठवाड्याच्या राजधानीत, औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ४० हजार नागरिकांना तब्बल ६५९ कोटी रुपयांचे ‌कर्ज वितरित केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात कर्जवाटपात तिप्पट वाढ झाली आहे. मुद्रा लोनच्या माध्यमातून विनातारण कर्ज मिळत असल्यामुळे छोट्या उद्योजकांना त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे. १५ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरू केली होती, मात्र सरकारच्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण फारच कमी आहे.

Maharashtra Times 29 May 2017, 12:02 am
औरंगाबाद ः मराठवाड्याच्या राजधानीत, औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ४० हजार नागरिकांना तब्बल ६५९ कोटी रुपयांचे ‌कर्ज वितरित केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात कर्जवाटपात तिप्पट वाढ झाली आहे. मुद्रा लोनच्या माध्यमातून विनातारण कर्ज मिळत असल्यामुळे छोट्या उद्योजकांना त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे. १५ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरू केली होती, मात्र सरकारच्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण फारच कमी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mudra lone repayment issue
मुद्रा लोनच्या वसुलीची बँकांना चिंता

गेल्या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात १११ कोटींचे कर्ज वाटप झाले होते. याबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे सूत्रांनी सांगितले की, या वर्षी डिसेंबर २०१६अखेर ८६ हजार ९५१ नागरिकांना ३३२ कोटींचे कर्ज वाटप केले होते.
कर्जाची मागणी जास्त असल्यामुळे मार्चअखेर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता होती आणि तो वाढला. ६५९ कोटी रुपयांचे ‌कर्ज जिल्ह्यातील १ लाख ४० हजार नागरिकांना दिले.

कर्जासाची सोपी पद्धत
विनातारण कर्ज दिले जाते. त्यासाठी कोटेशन, परवाना, आधार कार्ड, फोटो, व्यवसायासंबंधीची माहिती द्यावी लागते. शिशू, किशोर आणि तरुण या तीन गटांत मुद्रा लोन योजनेत कर्जपुरवठा केला जातो. शिशुअंतर्गत ५० हजार, किशोरमध्ये ५० हजार ते पाच लाख, तर तरुणअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतचे लोन दिले जाते. जिल्ह्यात शिशुअंतर्गत ८४ हजार १३० नागरिकांना १६६ कोटी, तर किशोरअंतर्गत ४ हजार ४५५ नागरिकांना ८७ कोटी आणि तरुणअंतर्गत १ हजार ०६६ नागरिकांना ७८ कोटींचे वाटप करण्यात आले आहे.

परतफेड कमी
गेल्या तीन वर्षांत जेवढे कर्ज वाटप झाले आहे, त्याच्या परताव्याचे प्रमाण फारसा चांगले नाही. या विषयी कोणत्याच बँकेकडून अधिकृतपणे काही सांगितले जात नाही. नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत असून, त्यांच्यामुळे कर्ज देणे भाग पाडते. कर्ज घेतलेल्यांची परतफेड फारच कमी आहे. यामुळे या योजनांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह असून, मुद्रालोनमुळे अनुत्पादक मत्ता (एनपीए) वाढणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज