अ‍ॅपशहर

नांदेडमध्ये साहित्य संमेलन व्याख्यानमाला

नांदेडमध्ये २४ ते २६ जानेवारी दरम्यान नांदेड ‘साहित्य संमेलन व्याख्यानमाला’ होत असून मान्यवरांकडून विचारप्रबोधन केले जाणार आहे. अंदमान येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रख्यात विचारवंत व साहित्यिक शेषराव मोरे यांना डी. वाय. पाटील यांनी जाहीर केलेल्या संशोधनवृत्तीचा विनियोग करून ही व्याख्यानमाला सुरू होत आहे.

Maharashtra Times 20 Jan 2017, 3:12 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nanaded cultural program
नांदेडमध्ये साहित्य संमेलन व्याख्यानमाला

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेडमध्ये २४ ते २६ जानेवारी दरम्यान नांदेड ‘साहित्य संमेलन व्याख्यानमाला’ होत असून मान्यवरांकडून विचारप्रबोधन केले जाणार आहे. अंदमान येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रख्यात विचारवंत व साहित्यिक शेषराव मोरे यांना डी. वाय. पाटील यांनी जाहीर केलेल्या संशोधनवृत्तीचा विनियोग करून ही व्याख्यानमाला सुरू होत आहे.
व्याख्यानमालेतील पहिले पुष्प, २४ जानेवारीला प्रख्यात अर्थतज्ज्ञ व अर्थ विश्लेषक अभय टिळक (पुणे) गुंफणार आहेत. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर ‘आर्थिक उदारीकरणाची पंचेवीस वर्षे व पुढील दिशा’ या विषयावर अर्थकारणाची मूलगामी चिकित्सा ऐकायला मिळणार आहे.
२५ जानेवारीला भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत (पुणे) व्याख्यानातून ‘सेक्युलर हिंदुत्त्व’ समजून देणार आहेत. २६ जानेवारीस या व्याख्यानमालेत, ‘मुस्लिम मनाचा शोध’ या शेषराव मोरे लिखित ग्रंथलेखनास सहकार्य करणारे मुळचे नांदेडचे व शिक्षण उपसंचालक पदावरून निवृत्त झालेले, इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक प्राचार्य गुलाम समदानी यांची प्रकट मुलाखत रंगणार आहे. मुलाखतीचा विषय असेल ‘इस्लाम समजून घेताना’. कुसुम सभागृहात रोज सायंकाळी सहाला ही व्याख्यानमाला होत आहे.
पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात, स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आजी-माजी साहित्य संमेलनाध्यक्ष अनुक्रमे सदानंद मोरे आणि श्रीपाल सबनीस तसेच २०१५ मध्ये अंदमान येथे झालेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची संशोधनवृत्ती जाहीर केली होती. तो धनादेश प्राप्त झाल्यावर सर्वच ग्रंथ लेखन संशोधन करूनच करणारे मोरे यांनी या पैशाचा उपयोग संशोधनाऐवजी समाज प्रबोधनासाठी करणार असल्याचे पाटील यांना पत्र लिहून कळविले होते.
....
मला मिळालेल्या संशोधनवृत्तीचा विनियोग करून ‘साहित्य संमेलन व्याख्यानमाले’चा आरंभ होत आहे. कृतज्ञतापूर्वक डी. वाय. पाटील विद्यापीठाचा उल्लेख त्यात केला जाणार आहे. माझा स्वत:चा निधी घालून ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाणार आहे.
-शेषराव मोरे,
ज्येष्ठ विचारवंत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज