औरंगाबाद : देशभरात एक जूनपासून दोनशे रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी टिव्टरवर दिली होती. एक जूनपासून धावणाऱ्या रेल्वेचे 'आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावरून बुकिंग गुरुवारपासून करण्यात येणार असल्याचे संकेत रेल्वे विभागाने दिले आहेत. रेल्वेने विभागाने जाहीर केलेल्या दोनशे रेल्वेत नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय इतर काही रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव नांदेडहून रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. 'श्रमिक'रेल्वे सोबत या रेल्वे निश्चित केलेल्या वेळेनुसार सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.
नांदेड-अमृतसर रेल्वे धावणार?
देशभरात एक जूनपासून दोनशे रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी टिव्टरवर दिली होती...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2020, 4:00 am