नांदेड: अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या मदतीचे १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात दोन-तीन वर्षांपासून पावसाचा लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदा जून ते ऑक्टोबर या कालावधीत निसर्गाच्या अवकृपेचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकांसह बागायती व फळ पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसानेही चांगलाच तडाखा दिला होता. ५ लाख ६४ हजार ५१८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तत्काळ पाठविण्याबाबत सूचना केल्या होत्या.
जिल्हा प्रशासनाने १६ तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून, राज्य सरकारकडे रीतसर निधीची मागणी केली होती. ५६५ कोटी रुपये मागणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा म्हणून पहिल्या टप्प्यात २८२ कोटी रुपये देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील २८२ कोटी ५६ लाख रुपये सोमवारी प्राप्त झाले आहेत. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुकानिहाय निधी याप्रमाणे मंजूर झाला आहे. नांदेड (१० कोटी ३३ लाख रुपये), अर्धापूर (८ कोटी ५१ लाख), कंधार (२० कोटी ७६ लाख), लोहा (२६ कोटी ३६ लाख), बिलोली (१६ कोटी २० लाख), नायगाव (१९ कोटी १९ लाख), देगलूर (२२ कोटी ४१ लाख), मुखेड (२४ कोटी ४० लाख), भोकर (१९ कोटी ५७ लाख), मुदखेड (७ कोटी ३९ लाख), धर्माबाद (१० कोटी २३ लाख), उमरी (१४ कोटी ३७ लाख), हदगाव (३२ कोटी ८१ लाख), हिमायतनगर (१५ कोटी ८९ लाख), किनवट (२४ कोटी २३ लाख) व माहूर (९ कोटी ८३ लाख रुपये) निधी मिळणार आहे. नुकसान भरपाईचा निधी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार मिळणार आहे. काही दिवसांपासून आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना हा निधी दिलासा देणारा ठरणारा आहे.
जिल्ह्यात दोन-तीन वर्षांपासून पावसाचा लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदा जून ते ऑक्टोबर या कालावधीत निसर्गाच्या अवकृपेचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकांसह बागायती व फळ पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसानेही चांगलाच तडाखा दिला होता. ५ लाख ६४ हजार ५१८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तत्काळ पाठविण्याबाबत सूचना केल्या होत्या.
जिल्हा प्रशासनाने १६ तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून, राज्य सरकारकडे रीतसर निधीची मागणी केली होती. ५६५ कोटी रुपये मागणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा म्हणून पहिल्या टप्प्यात २८२ कोटी रुपये देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील २८२ कोटी ५६ लाख रुपये सोमवारी प्राप्त झाले आहेत. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुकानिहाय निधी याप्रमाणे मंजूर झाला आहे. नांदेड (१० कोटी ३३ लाख रुपये), अर्धापूर (८ कोटी ५१ लाख), कंधार (२० कोटी ७६ लाख), लोहा (२६ कोटी ३६ लाख), बिलोली (१६ कोटी २० लाख), नायगाव (१९ कोटी १९ लाख), देगलूर (२२ कोटी ४१ लाख), मुखेड (२४ कोटी ४० लाख), भोकर (१९ कोटी ५७ लाख), मुदखेड (७ कोटी ३९ लाख), धर्माबाद (१० कोटी २३ लाख), उमरी (१४ कोटी ३७ लाख), हदगाव (३२ कोटी ८१ लाख), हिमायतनगर (१५ कोटी ८९ लाख), किनवट (२४ कोटी २३ लाख) व माहूर (९ कोटी ८३ लाख रुपये) निधी मिळणार आहे. नुकसान भरपाईचा निधी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार मिळणार आहे. काही दिवसांपासून आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना हा निधी दिलासा देणारा ठरणारा आहे.