अ‍ॅपशहर

‘कलावंत जगावेत असे वाटते का?’

‘कलावंतांना एका दिवसाला ७० रुपये पेन्शन मिळते. कलावंत जगावेत असे सरकारला वाटते का,’ असा परखड सवाल नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी शुक्रवारी केला. ‘कलावंत जगावेत असे वाटत असेल, तर किमान जीवन जगण्याइतपत पेन्शन सरकारने कलावंतांच्या खिशापर्यंत पोहोचवावी,’ असे खडे बोल त्यांनी सुनावले.

Maharashtra Times 22 Apr 2017, 3:00 am
Chintamani.Patki@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम natya samalen
‘कलावंत जगावेत असे वाटते का?’

Tweet : @chintamanipM
सुलभा देशपांडे, रंगमंच उस्मानाबाद : ‘कलावंतांना एका दिवसाला ७० रुपये पेन्शन मिळते. कलावंत जगावेत असे सरकारला वाटते का,’ असा परखड सवाल नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी शुक्रवारी केला. ‘कलावंत जगावेत असे वाटत असेल, तर किमान जीवन जगण्याइतपत पेन्शन सरकारने कलावंतांच्या खिशापर्यंत पोहोचवावी,’ असे खडे बोल त्यांनी सुनावले.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे उस्मानाबाद येथे आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सावरकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उद्घाटनाने संमेलनाचा पडदा उघडला. गंगाराम गवाणकर यांनी अध्यक्षपदाची सूत्र जयंत सावरकर यांच्याकडे प्रदान केली. या वेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, स्वागताध्यक्ष आमदार सुजीतसिंह ठाकूर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाठक, उपाध्यक्ष अर्चना पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, आयोजक विशाल शिंगाडे उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज