अ‍ॅपशहर

नवे ९१ हजार कामगार पीएफच्या कक्षेत

भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) कक्षेत कामगारांना आणण्यासाठी विशेष योजनेंतर्गत नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यात गेल्या सहा महिन्यांत सुमारे ९१ हजार नवीन कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.

Maharashtra Times 27 Jul 2017, 2:31 am
औरंगाबाद : भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) कक्षेत कामगारांना आणण्यासाठी विशेष योजनेंतर्गत नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यात गेल्या सहा महिन्यांत सुमारे ९१ हजार नवीन कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new 91000 workers are in the pf net
नवे ९१ हजार कामगार पीएफच्या कक्षेत


वीसपेक्षा अधिक कर्मचारी असलेले प्रत्येक व्यवस्थापन, कंपनी यांनी भविष्य निर्वाह निधी भरणे बंधनकारक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नोंदणी करून पीएफ क्रमांक घेणे बंधनकारक आहे, मात्र पीएफ कायद्यातील पळवाटा शोधून अनेकजण कर्मचाऱ्यांचे पीएफ भरत नाहीत. कामगारांची अनेकदा दिशाभूल केली जाते. परिणामी, पीएफच्या हक्कापासून अनेक कामगार वंचित राहतात. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व कामगार पीएफच्या कक्षेत आणण्यासाठी जानेवारी २०१७पासून विशेष योजना सुरू केली.

त्यात एप्रिल २००९ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत नोंदणी नसलेल्या कामगारांची भविष्य निर्वाह निधीचे सदस्य म्हणून नोंदणीचे नियोजन होते. नोंदणीसाठी सुरुवातील ३० मार्चपर्यंत मुदत होती. त्यात वाढ करून ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.

औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबादसह बीड, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. आयुक्त एम. एच. वारसी यांच्या पुढाकाराने कामगार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

जास्तीत जास्त कामगार पीएफच्या कक्षेत यावेत म्हणून ही योजना लागू करण्यात आली. सुमारे ५४ हजार नोंदणीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ९१ हजाराहून अधिक नोंदणी झाली.
- एम. एच. वारसी, आयुक्त, पीएफ विभाग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज