अ‍ॅपशहर

दारात वरात आली, लग्नाच्या विधी सुरू झाल्या अन् आला एक फोन, क्षणात घडलं भयंकर

लगीन घर असल्याने सगळ्यांच्या तोंडावर हसू होतं. वरात सुद्धा आली. नवरा स्टेजवर येऊन बसला आणि मंडपात लग्नाचा विधी सुरु झाला. पण याचवेळी एक फोन आला आणि लग्नाच्या जश्नात मातम सुरू झाला.

Maharashtra Times 25 Jan 2022, 11:53 am
औरंगाबाद : लग्नाची तयारी झाली, वरात सुद्धा आली. नवरा स्टेजवर येऊन बसला आणि मंडपात लग्नाचा विधी सुरु झाला. पण याचवेळी एक फोन आला आणि लग्नाच्या जश्नात मातम सुरू झाला. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते तर हुंदक्यांचा बांध फुटला होता. कारण मंडपात मुलाच्या लग्नाचा विधी सुरु असतांनाच दुसरीकडे वडिलांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी औरंगाबादच्या वैजापूर शहरात समोर आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wedding


औरंगाबाद शहरातील सिल्कमिल कॉलनीतील मिर्झा हबीबउल्ला बेग यांचे पुत्र मिर्झा उमेरउल्ला याचं वैजापूरच्या मुस्तफा पार्कमध्ये राहणाऱ्या अमजद पठाण यांच्या मुलीसोबत सोमवारी सकाळी विवाह होणार होता. लग्नाची वऱ्हाड औरंगाबादहुन वैजापूरकडे निघालं, पण याचवेळी नवरदेवाचे वडील मिर्झा हबीबउल्ला बेग यांना धावपळीमुळे दोन दिवसापांसून अस्वस्थ वाटत होते. असे असतानाही त्यांनी कुटुंब, शेजारी व पाहुण्यांना लग्न लावण्यासाठी जीपमधून पुढे पाठवले. तुम्ही पुढे चला मी दवाखान्या दाखवून येतो, असे म्हणत ते दवाखान्यात गेले.

Wardha Accident : वर्ध्यात भाजप आमदाराच्या मुलासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाहा अपघातानंतरचा पहिला VIDEOइकडे वऱ्हाड वैजापूरला पोहचले, लग्नाची तयारी सुरू झाली, नवरदेव स्टेजवर येऊन बसला आणि लग्नाची विधी काजीकडून सुरू झाली. काजीकडून खुदब्याच वाचन सुरू असतानाच, नवरदेवाच्या मामाचा फोनवरून मिर्झा हबीबउल्ला बेग यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली.अशा परिस्थितीत काय करावे सुचेना आणि हृदयावर दगड ठेवून पुढील कार्यक्रम वाद्य न वाजवता पार पाडण्यात आला.त्यानंतर सर्वानी औरंगाबादला धाव घेतली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बेग यांची अंत्ययात्रा (जनाजा) काढण्यात आली. यावेळी दिवसभरात रोखून धरलेल्या अश्रूंना सर्वानी मोकळी वाट करून दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज