म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. अध्यक्षांच्या आडमुठेपणामुळे दाखल करण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. समितीचे १८पैकी १३ संचालक सभापतीच्या विरोधात गेले आहेत. १३ जणांनी त्यांच्या स्वाक्षरीचे अविश्वास ठरावाचे पत्र सहकार निबंधक कार्यालयात दाखल केले आहे.
बाजार समितीचे संचालक मंडळ ५ ऑगस्ट २०१५ रोजी विराजमान झाले. त्यानंतर अवघ्या ११ महिन्यांतच भाजपच्या संचालकांनी त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. उपसभापती भागचंद ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सतीश खरे यांच्याकडे प्रस्ताव दिला. प्रस्तावात म्हटले आहे की, सभापती संजय औताडे हे संचालकांना विश्वासात घेऊन काम करीत नाहीत. त्यांच्या बेकायदा कामकाजाला आमचा विरोध आहे. बाजार समितीच्या हितासाठी सभापती विरोधात आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल करीत आहोत.
निर्णय ३ ऑक्टोबर रोजी
सभापतींवरील अविश्वास प्रस्तावावर दामोदर नवपुते, रघुनाथ काळे, राम शेळके, अलका दहिहंडे, संगीता मदगे, गणेश दहिहंडे, विकास दांडगे, शिवाजी वाघ, बाबासाहेब मुगदल, प्रशांत सोकिया, हरिशंकर दायमा यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले. अविश्वास ठरावावर ३ ऑक्टोबरला निर्णय होणार असून, कृषी उत्पन्न बाजार समितीत नवा अध्यक्ष निवडला जाईल, की पुन्हा प्रशासक बसवून संचालक मंडळच बरखास्त होईल हे त्यादिवशी पर्यंत कळेल.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. अध्यक्षांच्या आडमुठेपणामुळे दाखल करण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. समितीचे १८पैकी १३ संचालक सभापतीच्या विरोधात गेले आहेत. १३ जणांनी त्यांच्या स्वाक्षरीचे अविश्वास ठरावाचे पत्र सहकार निबंधक कार्यालयात दाखल केले आहे.
बाजार समितीचे संचालक मंडळ ५ ऑगस्ट २०१५ रोजी विराजमान झाले. त्यानंतर अवघ्या ११ महिन्यांतच भाजपच्या संचालकांनी त्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. उपसभापती भागचंद ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सतीश खरे यांच्याकडे प्रस्ताव दिला. प्रस्तावात म्हटले आहे की, सभापती संजय औताडे हे संचालकांना विश्वासात घेऊन काम करीत नाहीत. त्यांच्या बेकायदा कामकाजाला आमचा विरोध आहे. बाजार समितीच्या हितासाठी सभापती विरोधात आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल करीत आहोत.
निर्णय ३ ऑक्टोबर रोजी
सभापतींवरील अविश्वास प्रस्तावावर दामोदर नवपुते, रघुनाथ काळे, राम शेळके, अलका दहिहंडे, संगीता मदगे, गणेश दहिहंडे, विकास दांडगे, शिवाजी वाघ, बाबासाहेब मुगदल, प्रशांत सोकिया, हरिशंकर दायमा यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले. अविश्वास ठरावावर ३ ऑक्टोबरला निर्णय होणार असून, कृषी उत्पन्न बाजार समितीत नवा अध्यक्ष निवडला जाईल, की पुन्हा प्रशासक बसवून संचालक मंडळच बरखास्त होईल हे त्यादिवशी पर्यंत कळेल.