म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शटडाउनच्या पाच दिवसांनंतरही शहरात पाणीबाणी कायम आहे. शटडाउनमुळे पाण्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले असले, तरी त्यानुसार पाणीपुरवठा होत नाही. शहराच्या अनेक भागात पाच ते सात तास उशिराने पाणीपुरवठा करण्यात येत असून ४५ मिनिटांऐवजी ३० ते ३५ मिनिटेच पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेने शुक्रवारी ३६ तासांचे मेगाशटडाउन घेतले. या काळात सुमारे २५ ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात आली. शनिवारी रात्री दुरुस्तीचे काम संपल्यानंतर जायकवाडीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे शनिवारी शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात सोमवारी पाणीपुरवठा होईल, रविवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात मंगळवारी पाणीपुरवठा होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात दोनच्या ऐवजी तीन दिवसांही अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले. शटडाउन संपून पाच दिवस उटलेतरी पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. प्रामुख्याने सिडको-हडको, मुकुंदवाडी-चिकलठाणा आणि विद्यापीठ परिसरात नियोजित वेळेपेक्षा पाच ते सात तास उशिराने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठ्याच्या वेळातही कपात झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पण, पाणीपुरवठा विभागाने पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा केला आहे.
शटडाउनच्या पाच दिवसांनंतरही शहरात पाणीबाणी कायम आहे. शटडाउनमुळे पाण्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले असले, तरी त्यानुसार पाणीपुरवठा होत नाही. शहराच्या अनेक भागात पाच ते सात तास उशिराने पाणीपुरवठा करण्यात येत असून ४५ मिनिटांऐवजी ३० ते ३५ मिनिटेच पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेने शुक्रवारी ३६ तासांचे मेगाशटडाउन घेतले. या काळात सुमारे २५ ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात आली. शनिवारी रात्री दुरुस्तीचे काम संपल्यानंतर जायकवाडीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे शनिवारी शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात सोमवारी पाणीपुरवठा होईल, रविवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात मंगळवारी पाणीपुरवठा होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात दोनच्या ऐवजी तीन दिवसांही अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले. शटडाउन संपून पाच दिवस उटलेतरी पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. प्रामुख्याने सिडको-हडको, मुकुंदवाडी-चिकलठाणा आणि विद्यापीठ परिसरात नियोजित वेळेपेक्षा पाच ते सात तास उशिराने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठ्याच्या वेळातही कपात झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पण, पाणीपुरवठा विभागाने पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा केला आहे.