औरंगाबाद : ओबीसी कोड टाकून देशातील सर्व इतर मागास प्रवर्गाची जनगणना करा आणि मंडल आयोगाच्या शिफारशींची देशभर अंमलबजावणी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीने केली. या मागणीसाठी गुरुवारी क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत ओबीसी प्रवर्गाला असलेल्या आरक्षणाची व्याप्ती लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये राखीव संघ निर्माण करुन वाढवावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, ओबीसींचा सरकारी नोकऱ्यातील अनुशेष दूर करा, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या. विलास चंदने, तुकाराम शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
न्याय-हक्कासाठी ओबीसीची निदर्शने
ओबीसी कोड टाकून देशातील सर्व इतर मागास प्रवर्गाची जनगणना करा आणि मंडल आयोगाच्या शिफारशींची देशभर अंमलबजावणी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ओबीसी ...
Maharashtra Times 13 Jul 2018, 4:00 am