पैठण : आनंदपूर शिवारात (ता. पैठण) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. भारत मुरलीधर ठेंणगे (वय ५६) हे सायंकाळी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते घरी परत आले नाहीत, म्हणून त्यांचे कुटुंबीय शेतात गेले असता. त्यांना त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरताली नागरिक जमले. त्यावेळी बिबट्याने त्यांचा मृतदेह ओढून नेला. या घटनेची माहिती वन विभागाला कळविण्यात आली आहे. मे महिन्यात या परिसरात बिबट्या दिसला होता. साधारणपणे महिनाभर त्याचा वावर होता, असे परिसरातील नगारिकांनी सांगितले.
बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
आनंदपूर शिवारात (ता पैठण) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली...
Maharashtra Times 7 Sep 2018, 4:00 am