म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर व जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता १४ पर्यंत गेली आहे. त्यापैकी एकाचा रविवारी (चार एप्रिल) मृत्यू झाला, तर एक करोनाबाधित महिला पूर्णपणे करोनामुक्त झाली आहे. मात्र या करोनाबाधितांपैकी केवळ एकानेच विदेशवारी केली होती, तर इतर बहुतांश व्यक्तींना समुदाअंतर्गत संसर्ग झाल्याचे चित्र आहे. हा प्रकार केवळ औरंगाबाद शहरात नसून, बहुतेक ठिकाणी असेच आहे. त्यामुळे आपल्या देशाने करोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, तर अजूनही आपण दुसऱयाच पायरीवर आहोत, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
औरंगाबाद शहर, जिल्ह्यातील १४ करोनाबाधितांपैकी केवळ पहिल्याच करोनाबाधित ५९ वर्षीय महिलेने विदेशात प्रवास केला होता. त्यानंतर करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झालेल्या १३ व्यक्तींनी कुठेही विदेशवारी केली नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या व नंतर औरंगाबाद शहरात आलेल्या व्यक्तींपैकी किंवा २८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहरात झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी एकही व्यक्ती अजूनपर्यंत करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झालेले नाही.
केवळ एका पॉझिटिव्ह महिलेचा पती हा दुसऱ्या राज्यात प्रवास करून आला होता व मृत करोनाबाधित हा मुंबईत नोकरीला होता, एवढेच मोजके धागेदोरे हे बाधितांमागील प्रवासाचे असल्याचे दिसून येत आहे. या शिवाय बहुतेक इतर बाधितांना एकमेकांपासून बाधा झाल्याचे समोर येत आहे. याचाच अर्थ आता या टप्प्यावर बहुतेकांना करोना विषाणूची बाधा ही एकमेकांपासून होत आहे आणि शहरातील बहुतेक बाधितांची उदाहरणे त्याचीच आहेत, असेही म्हटले जात आहे.
या संदर्भात 'वर्ल्ड मेडिकल असोसिएशन'चे कोषाध्यक्ष व 'आयएमए'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले, आता सगळीकडेच 'ट्रॅव्हल हिस्ट्री'च्या केसेस खूप कमी झाल्या आहेत आणि एकमेकांपासून संसर्ग झाल्याच्या केसेस सर्वाधिक आहेत. निदान निम्म्यापेक्षा जास्त केसेस या नक्कीच एकमेकांपासून संसर्ग झाल्याच्या आहेत, ज्याला 'कम्युनिटी स्प्रेड'च्या केसेस म्हटले जाते. 'कम्युनिटी स्प्रेड'च्या केसेस या विषाणू प्रसाराच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये असतात. त्यामुळे आता आपण विषाणू प्रसाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असे म्हणावे लागेल. अर्थात, सरकारने तसे जाहीर केले नसले तरी त्याला 'लोकल कम्युनिटी ट्रान्समिशन'असे म्हटले आहे, असेही डॉ. वानखेडे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
ज्या पद्धतीने व वेगाने आता विषाणू प्रसार होत आहे, त्यानुसार आता आपण विषाणू प्रसाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला असण्याची दाट शक्यता आहे, असे निरीक्षण फिजिशियन असोसिएशनच्या शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे यांनी 'मटा'कडे नोंदवले. त्यामुळे आता आपण खरोखर तिसऱ्या टप्प्यावर असलो, तर मात्र यापुढे केसेसचे प्रमाण वाढू शकते, अशी शक्यता डॉ. पाटणे यांनी व्यक्त केली.
मागोवा शक्य नसेल तरच तिसरा टप्पा
आपण अजूनही विषाणू प्रसाराच्या दुसऱ्याच टप्प्यावर आहोत, असे सांगताना 'फिजिशियन असोसिएशन'च्या शहर शाखेचे सचिव डॉ. अनंत कुलकर्णी म्हणाले, जेव्हा संसर्गाच्या स्रोतांचा (सोर्स) मागोवा घेता येत नाही तेव्हा तो तिसरा टप्पा म्हणता येईल. याचाच अर्थ जी व्यक्ती कुठेही प्रवासाला गेली नाही किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली नाही आणि केवळ भाजी आणणे-दूध आणणे इतकाच मोजका वाव असतानाही त्या व्यक्तीला करोनाची बाधा झाली, तरच विषाणू प्रसाराचा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश केल्याचे म्हणता येईल, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
शहर व जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता १४ पर्यंत गेली आहे. त्यापैकी एकाचा रविवारी (चार एप्रिल) मृत्यू झाला, तर एक करोनाबाधित महिला पूर्णपणे करोनामुक्त झाली आहे. मात्र या करोनाबाधितांपैकी केवळ एकानेच विदेशवारी केली होती, तर इतर बहुतांश व्यक्तींना समुदाअंतर्गत संसर्ग झाल्याचे चित्र आहे. हा प्रकार केवळ औरंगाबाद शहरात नसून, बहुतेक ठिकाणी असेच आहे. त्यामुळे आपल्या देशाने करोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, तर अजूनही आपण दुसऱयाच पायरीवर आहोत, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
औरंगाबाद शहर, जिल्ह्यातील १४ करोनाबाधितांपैकी केवळ पहिल्याच करोनाबाधित ५९ वर्षीय महिलेने विदेशात प्रवास केला होता. त्यानंतर करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झालेल्या १३ व्यक्तींनी कुठेही विदेशवारी केली नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या व नंतर औरंगाबाद शहरात आलेल्या व्यक्तींपैकी किंवा २८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहरात झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी एकही व्यक्ती अजूनपर्यंत करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झालेले नाही.
केवळ एका पॉझिटिव्ह महिलेचा पती हा दुसऱ्या राज्यात प्रवास करून आला होता व मृत करोनाबाधित हा मुंबईत नोकरीला होता, एवढेच मोजके धागेदोरे हे बाधितांमागील प्रवासाचे असल्याचे दिसून येत आहे. या शिवाय बहुतेक इतर बाधितांना एकमेकांपासून बाधा झाल्याचे समोर येत आहे. याचाच अर्थ आता या टप्प्यावर बहुतेकांना करोना विषाणूची बाधा ही एकमेकांपासून होत आहे आणि शहरातील बहुतेक बाधितांची उदाहरणे त्याचीच आहेत, असेही म्हटले जात आहे.
या संदर्भात 'वर्ल्ड मेडिकल असोसिएशन'चे कोषाध्यक्ष व 'आयएमए'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले, आता सगळीकडेच 'ट्रॅव्हल हिस्ट्री'च्या केसेस खूप कमी झाल्या आहेत आणि एकमेकांपासून संसर्ग झाल्याच्या केसेस सर्वाधिक आहेत. निदान निम्म्यापेक्षा जास्त केसेस या नक्कीच एकमेकांपासून संसर्ग झाल्याच्या आहेत, ज्याला 'कम्युनिटी स्प्रेड'च्या केसेस म्हटले जाते. 'कम्युनिटी स्प्रेड'च्या केसेस या विषाणू प्रसाराच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये असतात. त्यामुळे आता आपण विषाणू प्रसाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असे म्हणावे लागेल. अर्थात, सरकारने तसे जाहीर केले नसले तरी त्याला 'लोकल कम्युनिटी ट्रान्समिशन'असे म्हटले आहे, असेही डॉ. वानखेडे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
ज्या पद्धतीने व वेगाने आता विषाणू प्रसार होत आहे, त्यानुसार आता आपण विषाणू प्रसाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला असण्याची दाट शक्यता आहे, असे निरीक्षण फिजिशियन असोसिएशनच्या शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे यांनी 'मटा'कडे नोंदवले. त्यामुळे आता आपण खरोखर तिसऱ्या टप्प्यावर असलो, तर मात्र यापुढे केसेसचे प्रमाण वाढू शकते, अशी शक्यता डॉ. पाटणे यांनी व्यक्त केली.
मागोवा शक्य नसेल तरच तिसरा टप्पा
आपण अजूनही विषाणू प्रसाराच्या दुसऱ्याच टप्प्यावर आहोत, असे सांगताना 'फिजिशियन असोसिएशन'च्या शहर शाखेचे सचिव डॉ. अनंत कुलकर्णी म्हणाले, जेव्हा संसर्गाच्या स्रोतांचा (सोर्स) मागोवा घेता येत नाही तेव्हा तो तिसरा टप्पा म्हणता येईल. याचाच अर्थ जी व्यक्ती कुठेही प्रवासाला गेली नाही किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली नाही आणि केवळ भाजी आणणे-दूध आणणे इतकाच मोजका वाव असतानाही त्या व्यक्तीला करोनाची बाधा झाली, तरच विषाणू प्रसाराचा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश केल्याचे म्हणता येईल, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.