म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबईत ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा महामोर्चाच्या समन्वयासाठी जळगाव टी-पॉइंट रोड येथील बजरंग चौकात शनिवारी (२४ जून) राज्यव्यापी मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन अंकुशराव कदम, मधुकरराव मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात मोर्चातील समन्वयकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्यासह देश, विदेशात ५७ हून अधिक मोठे मोर्चे निघालेले असतानाही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे समाज पुन्हा एकदा संतापला असून महामोर्चासाठी सज्ज झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुंबईत होणाऱ्या महामोर्चाचे गावपातळीवर नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किती आणि कसे समाज बांधव महामोर्चात सहभागी होतील, याबद्दलचे नियोजन करण्यात आले. तसेच सरकारसोबत चर्चा करण्यासाठी एक समिती असावी, म्हणजे प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल, अशी सूचनाही यावेळी एका समन्वयकाने केली. दरम्यान, यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान संदीप जाधव (रा. केळगाव ता. सिल्लोड) व श्रावण माने (कोल्हापूर) यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.
मुंबईत ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा महामोर्चाच्या समन्वयासाठी जळगाव टी-पॉइंट रोड येथील बजरंग चौकात शनिवारी (२४ जून) राज्यव्यापी मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन अंकुशराव कदम, मधुकरराव मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात मोर्चातील समन्वयकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्यासह देश, विदेशात ५७ हून अधिक मोठे मोर्चे निघालेले असतानाही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे समाज पुन्हा एकदा संतापला असून महामोर्चासाठी सज्ज झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुंबईत होणाऱ्या महामोर्चाचे गावपातळीवर नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किती आणि कसे समाज बांधव महामोर्चात सहभागी होतील, याबद्दलचे नियोजन करण्यात आले. तसेच सरकारसोबत चर्चा करण्यासाठी एक समिती असावी, म्हणजे प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल, अशी सूचनाही यावेळी एका समन्वयकाने केली. दरम्यान, यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान संदीप जाधव (रा. केळगाव ता. सिल्लोड) व श्रावण माने (कोल्हापूर) यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.