खुलताबाद: पूर्वी नागरिकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे जावे लागत होते, मात्र आता प्रशासनच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडे येत आहे. लोकाभिमुख प्रशासन आणण्याच्या प्रयत्नामुळे जनतेमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. समाधान शिबिर हे जनतेचे प्रश्न व तक्रारी सोडविण्याचे व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे १९ मे रोजी खुलताबाद येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. यावेळी खुलताबाद ते म्हैसमाळ, काटशिवरी फाटा ते जटवाडा रस्त्याच्या कामांचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्टोबर २०१९ पर्यंत मतदारसंघातील रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा दावा त्यांनी केला. समाधान शिबिराचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घेण्याचे केले.
समाधान शिबिराचे खुलताबादेत आयोजन
पूर्वी नागरिकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे जावे लागत होते, मात्र आता प्रशासनच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडे येत आहे...
Maharashtra Times 9 May 2018, 5:00 am