म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र कर्जदार असलेल्या ३४ हजार ५९९ शेतकऱ्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना १७५ कोटी १० लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी थकबाकी कर्जदार २३ हजार १२९ शेतकऱ्यांसाठी १४८ कोटी ९० लाख रुपये तर प्रोत्साहनपर कर्जदार ११ हजार ४७० शेतकऱ्यांसाठी २६ कोटी १९ लाख रुपये रक्कम कर्जदार शेतकऱ्यांसाठीची आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत विविध राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या आतापर्यंत तीन ग्रीन यादया जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८२ हजार ५३८ शेतकरी या योजनेंतर्गत पात्र ठरले आहेत. यात पात्र कर्जदार शेतकऱ्यांना आतापर्यंत १७५ कोटी १० लाख ४७ हजार २९४ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून या योजनेंतर्गत ७७ लाख अर्ज प्राप्त झाले असून छाननीतंर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करून ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आले असून जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार येणार असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरू ठेवली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ८१ हजार ५६० कर्जमाफ झाले आहे. या कर्जमाफीमुळे थोडे-फार सुधारण्याची संधी उपलब्ध झाली. कर्जमाफी राज्य सरकारने योग्य आणि चांगली दिली आहे.
सिद्धेश्वर शेलार, शेतकरी
रा. मेडसिंगा, ता.उस्मानाबाद
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १० हजार ५८० रुपयांची कर्जमाफी झाली. कर्जमाफीचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. अल्पभूधारक, गोर-गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. आतापर्यंत अशा पद्धतीने कर्जमाफी झालीच नव्हती.
प्रमोद कठारे, शेतकरी
रा. सारोळा बु., ता. उस्मानाबाद
साखर वाटून व्यक्त केला आनंद
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील पांडूरंग झामणे यांचे ९६ हजार ६२७ रुपयांचे कर्जमाफ झाले आहे. ७ एकर शेती असूनही कर्जमाफीचा त्यांना लाभ झाला आहे. त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर त्यांनी गावात साखर वाटून राज्य सरकारचे आभार व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र कर्जदार असलेल्या ३४ हजार ५९९ शेतकऱ्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना १७५ कोटी १० लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी थकबाकी कर्जदार २३ हजार १२९ शेतकऱ्यांसाठी १४८ कोटी ९० लाख रुपये तर प्रोत्साहनपर कर्जदार ११ हजार ४७० शेतकऱ्यांसाठी २६ कोटी १९ लाख रुपये रक्कम कर्जदार शेतकऱ्यांसाठीची आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत विविध राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या आतापर्यंत तीन ग्रीन यादया जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८२ हजार ५३८ शेतकरी या योजनेंतर्गत पात्र ठरले आहेत. यात पात्र कर्जदार शेतकऱ्यांना आतापर्यंत १७५ कोटी १० लाख ४७ हजार २९४ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून या योजनेंतर्गत ७७ लाख अर्ज प्राप्त झाले असून छाननीतंर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करून ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आले असून जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार येणार असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरू ठेवली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ८१ हजार ५६० कर्जमाफ झाले आहे. या कर्जमाफीमुळे थोडे-फार सुधारण्याची संधी उपलब्ध झाली. कर्जमाफी राज्य सरकारने योग्य आणि चांगली दिली आहे.
सिद्धेश्वर शेलार, शेतकरी
रा. मेडसिंगा, ता.उस्मानाबाद
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १० हजार ५८० रुपयांची कर्जमाफी झाली. कर्जमाफीचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. अल्पभूधारक, गोर-गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. आतापर्यंत अशा पद्धतीने कर्जमाफी झालीच नव्हती.
प्रमोद कठारे, शेतकरी
रा. सारोळा बु., ता. उस्मानाबाद
साखर वाटून व्यक्त केला आनंद
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील पांडूरंग झामणे यांचे ९६ हजार ६२७ रुपयांचे कर्जमाफ झाले आहे. ७ एकर शेती असूनही कर्जमाफीचा त्यांना लाभ झाला आहे. त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर त्यांनी गावात साखर वाटून राज्य सरकारचे आभार व्यक्त केले.