अ‍ॅपशहर

​ पीक पंचनाम्यासाठी पाथरीत बैलगाडी मोर्चा

पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे पिकांचा पंचनामा करून गुरांना चारा उपलब्ध करावा तसेच पाणी प्रश्न सोडवून दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाथरी तहसीलवर बैलगाडी मोर्चा काढला.

Maharashtra Times 4 Aug 2017, 3:23 am
परभणी - पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे पिकांचा पंचनामा करून गुरांना चारा उपलब्ध करावा तसेच पाणी प्रश्न सोडवून दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाथरी तहसीलवर बैलगाडी मोर्चा काढला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pathri farmer strike
​ पीक पंचनाम्यासाठी पाथरीत बैलगाडी मोर्चा

या मोर्चात लोणी बु. येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी १ च्या दरम्यान शहरातील मोंढा परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. लोणी येथील शेतकऱ्यांसोबत या मोर्चात शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र धर्मे, तालुका संघटक मुंजाभाऊ कोल्हे, रावसाहेब निकम, ज्ञानेश्वर धर्मे यांचा सहभाग होता. तहसीलदार यांना यावेळी शेतकऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले. पीक पंचनामे करा, दुष्काळ जाहीर करा, गुरांना चारा उपलब्ध करून घ्या व गावातील पाणी टंचाई सोडवा अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज