औरंगाबाद : करोना संसर्गाची तमा न बाळगता शहरातून विनामास्क फिरणाऱ्या १७९ जणांवर महापालिकेच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ८९ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले. रस्त्यावर थुंकणाऱ्या ७९ नागरिकांकडून प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे सात हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले. रस्त्यावर कचरा टाचणाऱ्या २३ नागरिकांकडून प्रत्येकी १५० रुपयांप्रमाणे तीन हजार ४५० रुपये वसूल करण्यात आले. वीटखेडा येथील हॉटेलमध्ये जास्तीचा कचरा आढळून आला. त्यामुळे हॉटेल मालकाला अडीच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. दिवसभरात एकूण एक लाख तीन हजार ८५० रुपये दंडाच्या रुपात वसूल करण्यात आले. एक मे ते २८ सप्टेंबर या कालावधीत २६ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विनामास्क फिरणाऱ्या १७९ नागरिकांना दंड
करोना संसर्गाची तमा न बाळगता शहरातून विनामास्क फिरणाऱ्या १७९ जणांवर महापालिकेच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ८९ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स 29 Sep 2020, 2:59 pm