अ‍ॅपशहर

थकित पाणीपट्टी २६ कोटींची; पण पालिकेने भरले फक्त ५० लाख

ही रक्कम न भरल्यास २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असेही कळवले आहे. या नोटिशीनंतर पालिकेने पाटबंधारे विभागाला ५० लाखांचा धनादेश दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 20 Feb 2022, 7:53 am
औरंगाबाद : जायकवाडी पाटबंधारे विभागाने महापालिकेला थकित पाणीपट्टीच्या पोटी २६ कोटी ३२ लाख रुपये भरण्याची नोटीस दिली आहे. ही रक्कम न भरल्यास २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असेही कळवले आहे. या नोटिशीनंतर पालिकेने पाटबंधारे विभागाला ५० लाखांचा धनादेश दिला आहे. दर महिन्याला काही प्रमाणात उर्वरित रक्कम दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. यावर पाटबंधारे विभागाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad MUnicipal corporation


औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला जायकवाडी धरणातून पाणी उपसावे लागते. उपसल्या जाणाऱ्या पाण्याचा दर पाणीपट्टीच्या स्वरूपात महापालिकेला पाटबंधारे विभागाकडे जमा करावा लागतो; परंतु गेल्या काही वर्षांपासून पालिकेने पाणीपट्टी भरलीच नाही. त्याचा परिणाम म्हणून २६ कोटी ३२ लाख रुपयांची पाणीपट्टी पालिकेकडे थकली आहे.
करोनाचा धोका कमी झाल्यामुळे चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार?
ही थकबाकी भरा; अन्यथा शहराचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने २१ फेब्रुवारीपासून बंद केला जाईल. येत्या २५ फेब्रुवारीपासून पाणी उपसा पूर्णपणे बंद केला जाईल, असे पाटबंधारे विभागाने नोटीसच्या माध्यमातून महापालिकेला कळवले आहे. ही नोटीस मिळाल्यावर पालिकेने पन्नास लाखांचा धनादेश पाटबंधारे विभागाकडे नुकताच जमा केला आहे. परंतु त्यावर पाटबंधारे विभाग समाधानी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महत्वाचे लेख