अ‍ॅपशहर

लातूरला टंचाईच्या झळा, टँकरच्या संख्येत वाढ

मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात टंचाई कमी असली तरी त्याच्या काहीअंशाी झळा आता बसू लागल्या आहेत. सध्या लातूर जिल्ह्यात ३८ टँकरच्या माध्यमातून २८ गावांना आणि पाच वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील २७१ गावे आणि ७२ वाड्यांसाठी ४५९ विहिरी, विंधन विहिरी जिल्हा परिषदेने अधिग्रहीत केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बी. आर. शेलार यांनी दिली.

महाराष्ट्र टाइम्स 23 Apr 2019, 4:04 am
लातूर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water


मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात टंचाई कमी असली तरी त्याच्या काहीअंशाी झळा आता बसू लागल्या आहेत. सध्या लातूर जिल्ह्यात ३८ टँकरच्या माध्यमातून २८ गावांना आणि पाच वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील २७१ गावे आणि ७२ वाड्यांसाठी ४५९ विहिरी, विंधन विहिरी जिल्हा परिषदेने अधिग्रहीत केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बी. आर. शेलार यांनी दिली.

गेल्या २० दिवसांत लातूर जिल्ह्यातील टँकरची संख्या ही २८ ने वाढली आहे. २ एप्रिलला लातूर जिल्ह्यात २० टँकर सुरू होते. २२ एप्रिलला ३८ टँकर सुरू आहेत. दिवेंसदिवस पाणीटंचाई अधिक जाणवू लागली आहे. लातूर आणि इतर शहराला ज्या मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो. वाढत्या तापमानामुळे मांजरा धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असल्यामुळे पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने कमी होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी साखर पट्टा असलेल्या लातूर तालुक्यातील गावात पाणी टंचाई अधिक जाणवत आहे. एकूण ६३ गावे आणि चार वाड्यांसाठी १२० विंधन विहिरींच्या माध्यमातून आणि १६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. लातूरनंतर सर्वाधिक टँकर असलेला तालुका उदगीर आहे. उदगीर तालुक्यातील सहा गावांसाठी ११ टँकर सुरू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय टँकरची संख्या पुढील प्रमाणे आहे. रेणापूर आणि अहमदपूर तालुक्याला प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. जळकोट तालुक्यात चार आणि देवणी तालुक्यात तीन टँकर सुरू आहेत.

ज्या गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत जिवंत आहेत, किंवा ज्या विहिरीना चांगले पाणी आहे. त्या गावांना जिल्हा प्रशासन शक्यतो टॅँकरएैवजी नैसर्गिक स्त्रोताचा अधिक वापर करताना दिसून येत आहे. जिल्हाभरात त्या-त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीकडे ५६७ गावांसाठी ८३२ विंधनविहिरीच्या अधिग्रहणाच्या मागणीचे प्रस्ताव आहेत. प्रशासनाच्या स्थळपाहणीनुसार त्यातील ३५ गावे वगळण्यात आली आहेत. पंचायत समितीस्तरांवर ७९ गावांसाठी १६३ विंधन विहिरीची मागणी प्रलंबीत आहे. त्याच प्रमाणात टँकरची मागणी सुद्धा १८ गावे वाड्यासाठी १७ टँकरची मागणी प्रलंबित आहे.

तालुका गाव वाड्या विंधन विहिरी

औसा ४६ १५ ७३

निलंगा ३४ ८ ६२

रेणापूर ३३ ११ ४४

अहमदपूर ३० १२ ५४

चाकुर १७ ६ २३

शिरुर अनंतपाळ ५ २ ८

उदगीर २७ ८ ४७

देवणी ३ १ ६

जळकोट १३ ७ २३

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज