औरंगाबाद : सलग चार दिवस सुटी असल्याने रेल्वे स्टेशनवर होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने नांदेड आणि औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म तिकीटचा दर वाढवून वीस रुपये केला आहे. होळीनिमित्त २, ३ आणि ४ मार्च रोजी सलग सुट्यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढली आहे. या काळात प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी ३ मार्चच्या मध्यरात्री १२ पासून ५ मार्चच्या रात्री ११ पर्यंत नांदेड आणि औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर ही दरवाढ केली आहे ,अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. नियमित वेळी प्लॅटफॉर्म तिकीट दर १० रुपये आहे. नांदेड विभागाने औरंगाबाद येथे झालेल्या इज्तेमाच्या काळात प्लॅटफार्म तिकीटाचा दर वाढवला होता. या काळात रेल्वेला तीन दिवसांत तेरा हजारांपेक्षा जास्त कमाई प्लॉटफार्म तिकीट विक्रीतून झाली होती. या निर्णयाप्रमाणे सुटीच्या तीन दिवसांसाठी प्लॉटफार्म तिकीटाचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्लॅटफार्म तिकीट वीस रुपयांना
सलग चार दिवस सुटी असल्याने रेल्वे स्टेशनवर होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने नांदेड आणि औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म तिकीटचा दर वाढवून वीस रुपये केला आहे.
Maharashtra Times 5 Mar 2018, 3:31 pm