अ‍ॅपशहर

भगवानराव देशमुख यांचे निधन; मराठवाडा गीत पोरके झाले

प्रसिद्ध कवी-कथाकार प्राचार्य भगवानराव देशमुख (वय ८५) यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. खुमासदार शैलीतील कथाकथनामुळे देशमुख राज्यभर लोकप्रिय होते. मराठवाडा गीतामुळे देशमुख यांचा साहित्य क्षेत्रात मोठा दबदबा होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Feb 2020, 7:41 pm
औरंगाबाद: प्रसिद्ध कवी-कथाकार प्राचार्य भगवानराव देशमुख (वय ८५) यांचे शनिवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. खुमासदार शैलीतील कथाकथनामुळे देशमुख राज्यभर लोकप्रिय होते. मराठवाडा गीतामुळे देशमुख यांचा साहित्य क्षेत्रात मोठा दबदबा होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhagwanrao-deshmukh


भगवानराव देशमुख यांच्यावर सोयगाव येथे रविवारी (१ मार्च) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

भगवानराव देशमुख सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात प्राचार्य होते. मराठी साहित्यात कथा व कविता लेखनाद्वारे त्यांनी मोलाची भर घातली. कथा सांगण्याच्या खुमासदार शैलीमुळे देशमुख राज्यभर लोकप्रिय होते. विशेषत: ऐंशी-नव्वदच्या दशकात शेकडो कविसंमेलने आणि कथाकथनाचे कार्यक्रम त्यांनी गाजवले. मात्र, त्यांच्या नावावर एकही कथासंग्रह किंवा कवितासंग्रह नाही. मंचावर कथाकथन झाल्यानंतर त्यांनी ती कथा पुन्हा सांगितली नाही. त्यामुळे कथासंग्रह प्रकाशित होऊ शकला नाही. ग्रामीण भागातील निसर्ग, स्त्रियांचे भावविश्व आणि प्रेमाची अभिव्यक्ती असलेल्या उत्तमोत्तम कविता देशमुख यांनी लिहिल्या.

‘संत महंताची भूमी माझी मराठवाड्याची, भोळीभाबडी माणसं लय पुण्यवान माती’ हे मराठवाडा गीत विशेष लोकप्रिय ठरले होते. विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणूनही देशमुख ओेळखले जात होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध वाड्मयीन उपक्रमात देशमुख यांचा सहभाग होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज