औरंगाबाद - कवयित्री व चिंतनशील लेखिका सुचिता खल्लाळ यांच्या 'प्रलयानंतरची तळटीप' या काव्यसंग्रहाला कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय डॉ. वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कणकवली येथे २६ जानेवारी रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी खल्लाळ यांचे 'पायपोळ', 'तहहयात' हे दोन कवितासंग्रह आणि 'स्त्री कवितेचं भान - काल आणि आज' समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.
सुचिता खल्लाळ यांना काव्य पुरस्कार
औरंगाबाद - कवयित्री व चिंतनशील लेखिका सुचिता खल्लाळ यांच्या 'प्रलयानंतरची तळटीप' या काव्यसंग्रहाला कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय डॉ...
30 26 Dec 2018, 4:00 am