औरंगाबाद : ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यामुळे चर्चेत आलेल्या करुणा मुंडे यांच्या औरंगाबादमध्ये आज (मंगळवारी) होणाऱ्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. यावरून करुणा मुंडे यांनी नाव घेता, माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी कुणीतरी पोलिसांवर दबाव आणत आहे, असा गंभीर आरोप केला. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीवेळी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, काल आमच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी परवानगी दिली होती, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची तयारी सुद्धा झाली होती. मात्र रात्री अचानक पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलीस ठाण्यात बसून ठेवलं, तसेच परवानगी सुद्धा नाकारली. तसेच ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्याच्या मालकाला सुद्धा माझ्यामुळे त्रास देण्यात आला असा आरोप करुणा मुंडे-शर्मा यांनी केला आहे.
मी पुढे जात असल्यामुळे कुणाला काय भीती वाटत आहे, ज्यामुळे ते माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच हे कोण करत आहे हे लवकरच समोर येईल पण आत्ताच त्यांचे नाव घेणार नाही. माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी पोलिसांना मी जबाबदार धरणार नाही, कारण ते त्याचं काम करत आहे, पण त्यांच्यावर हे सर्व करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही...
सत्तेत बसलेल्या लोकांना गरिबांशी काही घेणं देणं नाही. त्यांना सत्ता हवी होती आणि आता सत्ता मिळाली आहे. सध्या घराणेशाहीची हुकुमशाही सुरू आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही असेही करुणा धनंजय मुंडे-शर्मा म्हणाल्या.
यावेळी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, काल आमच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी परवानगी दिली होती, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची तयारी सुद्धा झाली होती. मात्र रात्री अचानक पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलीस ठाण्यात बसून ठेवलं, तसेच परवानगी सुद्धा नाकारली. तसेच ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्याच्या मालकाला सुद्धा माझ्यामुळे त्रास देण्यात आला असा आरोप करुणा मुंडे-शर्मा यांनी केला आहे.
मी पुढे जात असल्यामुळे कुणाला काय भीती वाटत आहे, ज्यामुळे ते माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच हे कोण करत आहे हे लवकरच समोर येईल पण आत्ताच त्यांचे नाव घेणार नाही. माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी पोलिसांना मी जबाबदार धरणार नाही, कारण ते त्याचं काम करत आहे, पण त्यांच्यावर हे सर्व करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही...
सत्तेत बसलेल्या लोकांना गरिबांशी काही घेणं देणं नाही. त्यांना सत्ता हवी होती आणि आता सत्ता मिळाली आहे. सध्या घराणेशाहीची हुकुमशाही सुरू आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही असेही करुणा धनंजय मुंडे-शर्मा म्हणाल्या.