अ‍ॅपशहर

एव्हरेस्टवीर रफिकचं सरकारला ‘कौतुक’ नाहीच

हलाखीच्या परिस्थितीतही जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर (८८४८ मीटर उंच) सर करणारा महाराष्ट्र पोलिस दलाचा पहिला जवान असा बहुमान औरंगाबादच्या शेख रफिकने मिळविला. या ऐतिहासिक कामगिरीला पाच दिवस उलटूनही सरकारने कोणतीही आर्थिक मदत करण्याची तत्परता न दाखविल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.

Maharashtra Times 24 May 2016, 3:45 pm
Sudhir.Bhalerao@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rafiq shaikh still waiting for government help
एव्हरेस्टवीर रफिकचं सरकारला ‘कौतुक’ नाहीच


औरंगाबादः हलाखीच्या परिस्थितीतही जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर (८८४८ मीटर उंच) सर करणारा महाराष्ट्र पोलिस दलाचा पहिला जवान असा बहुमान औरंगाबादच्या शेख रफिकने मिळविला. या ऐतिहासिक कामगिरीला पाच दिवस उलटूनही सरकारने कोणतीही आर्थिक मदत करण्याची तत्परता न दाखविल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.

शेख रफिकने तिसऱ्या प्रयत्नात एव्हरेस्टचा सागरमाथा १९ मे रोजी गाठला. जगातील सर्वोच्च शिखरावर पोचल्याबद्दल रफिकवर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आघाडीवर होते. मात्र या कामगिरीनंतर रफिक थेट स्वगृही परतू शकलेला नाही. हिमदंशामुळे त्याला सोमवारी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. एव्हरेस्ट मोहिमेसाठी रफिकला आतापर्यंत सुमारे ७० लाख रुपये लागले आहेत. हा निधी त्याने बचत, कर्ज व आप्तेष्टांच्या मदतीने उभा केला. उपचारासाठी हलवण्याकरिता हेलिकॉप्टरचा उपयोग करण्यात आला. तो खर्चही त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे.

अशा स्थितीत गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून रफिकला आर्थिक मदत जाहीर होईल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. कारण एव्हरेस्टवीर होणारा महाराष्ट्र पोलिस दलातील रफिक हा पहिलाच जवान ठरला आहे, परंतु अद्याप सरकारने कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्याची तत्परता दाखवलेली नाही. एरवी क्रिकेट वा अन्य खेळातील पदक विजेत्यांवर तत्काळ लाखो रुपयांच्या पारितोषिकांचा वर्षाव होतो. मराठवाड्यातील एकमेव एव्हरेस्टवीर ठरल्यानंतरही रफिकच्या वाट्याला आतापर्यंत काहीच आलेले नाही, अशी भावना क्रीडा क्षेत्रात उमटू लागली आहे.

ब्रँड अॅम्बॅसेडर करा

शेख रफिकला एव्हरेस्ट मोहिमेसाठी बहुमोल मदत करणारे पुणे येथील सुरेंद्र शेळके म्हणाले, ‘रफिकचे हे यश ऐतिहासिक आहे. खरे तर त्याला आर्थिक मदतीची खूप गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट मदत जाहीर करायला हवी होती. तसेच रफिकला ब्रँड अॅम्बॅसेडर करण्याची गरज आहे. यंदाच्या मोहिमेसाठी रफिकला आतापर्यंत ३५-४० लाख रुपये खर्च आला आहे. हा खर्च तो एकटा निश्चितच करू शकत नाही. त्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने मदत करायला हवी.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज