म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शब्द आणि सूर यांचा अप्रतिम संगम साधलेल्या ‘पाऊस पाडवा’ कार्यक्रमात कवितांचा पाऊस पडला. लोकप्रिय कवितांच्या सादरीकरणाने रसिकांना खिळवून ठेवले. यानिमित्त जुन्या-नव्या पिढीतील कवींच्या दर्जेदार कविता रसिकांना ऐकायला मिळाल्या.
‘अक्षरलेणं’ प्रस्तुत पाऊस कवितांवर आधारित ‘पाऊस पाडवा’ कार्यक्रम विशेष रंगला. आयएमए हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी ही पावसाळी कवितांची मैफल झाली. या कार्यक्रमात सुधीर मोघे, सीमा मोघे, हर्षवर्धन दीक्षित, अश्विनी दाशरथे व विश्वनाथ दाशरथे यांनी कविता सादर केल्या. ‘आज म्हटलं पावसाला माफ कर बाबा’ ही कविता अश्विनी यांनी सादर केली. अभिजित दाते लिखित या कवितेत पावसाचे निराळे रंग रसिकांना दिसले. मंगेश पाडगावकर लिखित ‘आले आले नभ भरून, कुणी कलशापरी कुणी मयुरापरी’ ही लोकप्रिय कविता विशेष ठरली. सर्व वाचकांनी कवितेत रंग भरले. ‘घन घुंगूरवाळा आला गं’ ही कविता सुधीर मोघे यांनी सादर केली. तर गदिमांची ‘माउलीच्या दुधापरी आले तुषार’ ही कविता हर्षवर्धन यांनी सादर केली. ‘त्या मृगाला या मातीचा निरोप सांगा गडे’ (अश्विनी दाशरथे), ‘हलकेच निळा घन आला, बरसून गेला’ (सीमा मोघे), ‘खिडकीतून मी बघतो झाड’ (हर्षवर्धन) या कवितांना दाद मिळाली. विश्वनाथ दाशरथे यांनी कविता गायन केले. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. दर्जेदार कवितांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
शब्द आणि सूर यांचा अप्रतिम संगम साधलेल्या ‘पाऊस पाडवा’ कार्यक्रमात कवितांचा पाऊस पडला. लोकप्रिय कवितांच्या सादरीकरणाने रसिकांना खिळवून ठेवले. यानिमित्त जुन्या-नव्या पिढीतील कवींच्या दर्जेदार कविता रसिकांना ऐकायला मिळाल्या.
‘अक्षरलेणं’ प्रस्तुत पाऊस कवितांवर आधारित ‘पाऊस पाडवा’ कार्यक्रम विशेष रंगला. आयएमए हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी ही पावसाळी कवितांची मैफल झाली. या कार्यक्रमात सुधीर मोघे, सीमा मोघे, हर्षवर्धन दीक्षित, अश्विनी दाशरथे व विश्वनाथ दाशरथे यांनी कविता सादर केल्या. ‘आज म्हटलं पावसाला माफ कर बाबा’ ही कविता अश्विनी यांनी सादर केली. अभिजित दाते लिखित या कवितेत पावसाचे निराळे रंग रसिकांना दिसले. मंगेश पाडगावकर लिखित ‘आले आले नभ भरून, कुणी कलशापरी कुणी मयुरापरी’ ही लोकप्रिय कविता विशेष ठरली. सर्व वाचकांनी कवितेत रंग भरले. ‘घन घुंगूरवाळा आला गं’ ही कविता सुधीर मोघे यांनी सादर केली. तर गदिमांची ‘माउलीच्या दुधापरी आले तुषार’ ही कविता हर्षवर्धन यांनी सादर केली. ‘त्या मृगाला या मातीचा निरोप सांगा गडे’ (अश्विनी दाशरथे), ‘हलकेच निळा घन आला, बरसून गेला’ (सीमा मोघे), ‘खिडकीतून मी बघतो झाड’ (हर्षवर्धन) या कवितांना दाद मिळाली. विश्वनाथ दाशरथे यांनी कविता गायन केले. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. दर्जेदार कवितांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.