सोयगावः परतीच्या पावसामुळे कापसाने पूर्ण नुकसान झाल्याने एका शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी तालुक्यातील घोसला शिवारात शनिवारी घडला. विजय जगन बावस्कर (पाटील), असे शेतकऱ्याचे नाव आहे.
पाटील यांची घोसला शिवरातील गट नंबर ५० मध्ये शेती आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने त्यांच्या शेतामधील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पेरणीच्या काळात घेतलेले सरकारी बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडायचे यांची चिंता त्यांना लागून होती. या विवंचनेतच त्यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे वडील, भाऊ, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
पाटील यांची घोसला शिवरातील गट नंबर ५० मध्ये शेती आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने त्यांच्या शेतामधील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पेरणीच्या काळात घेतलेले सरकारी बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडायचे यांची चिंता त्यांना लागून होती. या विवंचनेतच त्यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे वडील, भाऊ, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.