म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आर्य समाजातर्फे सुरू करण्यात आलेल्या पर्जन्यवृष्टी महायज्ञाची पुर्णाहुती नुकतीच झाली. २७ जूनपासून महायज्ञ सुरू करण्यात आला होता. यावेळी संत महंत, गांधेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल तळेकर, दत्तू वाघमोडे, सरपंच शेख सरदार पटेल, पोलिस पाटील हरिभाऊ रसाळ, दयाराम बसैये, जुगलकिशोर दायमा, प्रवीण बसैये, वंदना बसैये, कीर्ती भानुशाली, हंसाबेन भानुशाली आदींची उपस्थिती होती.