म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या दोन वर्षांत १० हजार ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोचलेले तुरीचे दर ३४०० ते ३७०० रुपयांपर्यंत गडगडले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडीत सध्या मोठ्या प्रमाणात तुरीची आवक सुरू आहे. गेल्या महिन्याभरात तुरीच्या दरात सारखा चढ-उतार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा होती. तूर पिकाबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमाकांवर असून, लातूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, अकोला व नागपूर ही महाराष्ट्रातील तुरीची प्रमुख व्यापारी केंद्र मानली जातात. या सर्व ठिकाणी सध्या बंपर आवक होत आहे. लातूरला ३८०० ते ४००० पर्यंत भाव मिळाला आहे. मागील १५ वर्षांत पहिल्यांदाच एवढे बंपर पीक आले आहे. रोज किमान १५०० पोत्यांची आवक होत आहे. औरंगाबादसारख्या बाजार पेठेत ही अवस्था असेल, तर इतर मुख्य बाजारपेठांत काय स्थिती असेल, याची कल्पनाच करवत नाही, असेही जाधववाडीतील ज्येष्ठ व्यापारी हरिष पवार यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन-तीन वर्षांत तुरीचे दर १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. त्यामुळे या खरीप हंगामात तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली. डिसेंबरमध्ये तूर काढणीचा हंगाम सुरू होताच बाजारातील तुरीचा दर १२ हजार रुपयांहून ६५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरला. आता तर तो ४ हजारांच्या खालीच आला आहे.
दरम्यान, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे उत्पादन यावर्षी कमी झाल्याने तूर साथ देईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील तुरीच्या किमतीचे मासिक सरासरी पृथक्करण करून समतोल हवामानात तुरीची डिसेंबर २०१६मध्ये सरासरीची किंमत जवळपास ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अाम्ही बैचेन
पळशीचे शेतकरी महमंद शेख म्हणाले की, यंदा तुरीला चांगला भाव येईल, असे वाटत होते, परंतु ३ हजार ४०० ते ३ हजार ७०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. राबराब राबून पीक काढायचे आणि त्याला भाव नाही मिळाला की दु:ख करत बसायचे, अशीच आमची अवस्था आहे. यामुळे सध्या आम्ही बैचेन आहोत.
गेल्या दोन वर्षांत १० हजार ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोचलेले तुरीचे दर ३४०० ते ३७०० रुपयांपर्यंत गडगडले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडीत सध्या मोठ्या प्रमाणात तुरीची आवक सुरू आहे. गेल्या महिन्याभरात तुरीच्या दरात सारखा चढ-उतार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा होती. तूर पिकाबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमाकांवर असून, लातूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, अकोला व नागपूर ही महाराष्ट्रातील तुरीची प्रमुख व्यापारी केंद्र मानली जातात. या सर्व ठिकाणी सध्या बंपर आवक होत आहे. लातूरला ३८०० ते ४००० पर्यंत भाव मिळाला आहे. मागील १५ वर्षांत पहिल्यांदाच एवढे बंपर पीक आले आहे. रोज किमान १५०० पोत्यांची आवक होत आहे. औरंगाबादसारख्या बाजार पेठेत ही अवस्था असेल, तर इतर मुख्य बाजारपेठांत काय स्थिती असेल, याची कल्पनाच करवत नाही, असेही जाधववाडीतील ज्येष्ठ व्यापारी हरिष पवार यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन-तीन वर्षांत तुरीचे दर १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. त्यामुळे या खरीप हंगामात तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली. डिसेंबरमध्ये तूर काढणीचा हंगाम सुरू होताच बाजारातील तुरीचा दर १२ हजार रुपयांहून ६५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरला. आता तर तो ४ हजारांच्या खालीच आला आहे.
दरम्यान, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे उत्पादन यावर्षी कमी झाल्याने तूर साथ देईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील तुरीच्या किमतीचे मासिक सरासरी पृथक्करण करून समतोल हवामानात तुरीची डिसेंबर २०१६मध्ये सरासरीची किंमत जवळपास ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अाम्ही बैचेन
पळशीचे शेतकरी महमंद शेख म्हणाले की, यंदा तुरीला चांगला भाव येईल, असे वाटत होते, परंतु ३ हजार ४०० ते ३ हजार ७०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. राबराब राबून पीक काढायचे आणि त्याला भाव नाही मिळाला की दु:ख करत बसायचे, अशीच आमची अवस्था आहे. यामुळे सध्या आम्ही बैचेन आहोत.