अ‍ॅपशहर

आगीच्या कारणावरून तर्कवितर्कांना उधाण

जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटच्या अग्नितांडवाला चार दिवस उलटून गेले असले, तरी या अग्नितांडवात दोषी कोण, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर अाहे. त्यामुळे शहरात पाचव्या दिवशीही अग्नितांडवाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Maharashtra Times 3 Nov 2016, 3:00 am
औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटच्या अग्नितांडवाला चार दिवस उलटून गेले असले, तरी या अग्नितांडवात दोषी कोण, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर अाहे. त्यामुळे शहरात पाचव्या दिवशीही अग्नितांडवाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reasons of fire not detected
आगीच्या कारणावरून तर्कवितर्कांना उधाण

शनिवारी लागलेल्या आगीनंतर प्रशासकीय यंत्रणांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामे केले, मात्र त्यानंतर दिवाळी सणामुळे चौकशीला गती मिळाली नाही. यामुळे अग्नितांडवाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. फटाका बाजारामध्ये काही दिवसांपासून मोठमोठे पाइप टाकले आहेत. या पाईपमध्ये काही तरुण दररोज गांजा; तसेच इतर नशा करतात. हे लोक अग्नितांडवाला जबाबदार असल्याची चर्चा आहे.
एका प्रत्यक्षदर्शीच्या मते दुकानाच्या मागच्या बाजूस एका कचरावेचक महिलेने कचऱ्याला आग लावली होती, अशीही चर्चा आहे. दरम्यान, घटनेला चार दिवस उलटून गेले असले, तरी जिल्हा परिषद मैदानावर बघ्यांची गर्दी कायम आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज