अ‍ॅपशहर

विशेष वसुली मोहिमेत फक्त ३९ लाखांची वसुली

महापालिकेच्या विशेष वसुली व नियमितीकरण मोहिमेत सोमवारी पहिल्याच दिवशी दिवसभरात फक्त ३९ लाख ५८ हजार रुपयांची वसुली झाली...

Maharashtra Times 13 Nov 2018, 4:00 am

औरंगाबाद : महापालिकेच्या विशेष वसुली व नियमितीकरण मोहिमेत सोमवारी पहिल्याच दिवशी दिवसभरात फक्त ३९ लाख ५८ हजार रुपयांची वसुली झाली. वास्तविक पाहता मोहिमेदरम्यान रोज एक कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट नऊ झोन कार्यालयांना देण्यात आले आहे.

तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष वसुली व नियमितीकरण सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाला सोमवारपासून सुरूवात झाली. मोहिमेदरम्यान कमीत कमी ५० कोटी व जास्तीत जास्त १०० कोटी रुपयांची वसुली व्हावी, असे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक झोन कार्यालयाला रोज एक कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोमवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ३९ लाख ५८ हजार रुपयांची वसुली झाली.

मोहिमेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कर वसुलीची स्थिती स्पष्ट केले. ते म्हणाले, 'ऑक्टोबर अखेरपर्यंत गेल्यावर्षी ४१ कोटी आठ लाख रुपयांची मालमत्ता कराची वसुली होती. यंदा ५४ कोटी ८६ लाख रुपये वसूल झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ कोटींनी वसुली जास्त आहे. गेल्यावर्षी पाणीपट्टीची वसुली नऊ कोटी ५२ लाख रुपये होती, यंदा आतापर्यंत २० कोटी रुपये वसुल झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज