अ‍ॅपशहर

ठाकरेंकडील १०-१२ आमदार म्हणतात शिंदे गटात कसं यावं, आम्ही सांगितलं दमानं यावं; भुमरेंची टोलेबाजी

Uddhav Thackeray : संदिपान भुमरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्याकडे उरलेले आमदारही आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याचा दावा केला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2022, 4:08 pm
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटातील विविध मंत्री आणि आमदार हे उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधत आहेत. कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे हे 'मातोश्री'वर निशाणा साधणाऱ्या नेत्यांमध्ये आघाडीवर असतात. याच भुमरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्याकडील उरलेले आमदारही आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sandipan bhumare uddhav thackeray
संदिपान भुमरे - उद्धव ठाकरे


'ठाकरे गटात आता काय राहिलं आहे? जे १०-१२ आमदार राहिले आहेत, तेही आमच्याकडे येणार आहे. हे आमदार फोन करून म्हणतात कसं यावं? आम्ही म्हणतो जरा दमानं यावं,' अशी टोलेबाजी संदिपान भुमरे यांनी केली आहे.

शिवसेनेच्या चिन्हावर निर्णय कोण घेणार? शिंदे गटाच्या वकिलांकडून थेट १९७२च्या केसचा दाखला देत जोरदार युक्तिवाद

आमदारांच्या निधीवरूनही साधला निशाणा

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जी काही कारणं दिली जातात त्यामध्ये आमदारांना निधी मिळत नसल्याचं मुख्य कारण होतं. या मुद्द्यावरूनच शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेले ४० बंडखोर आमदार टीका करत होते. संदिपान भुमरे यांनीही आता याबाबत बोलताना म्हटलं आहे की, 'महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणायचे की सरकारकडे निधी नाही. मग आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर आमदारांना देण्यासाठी निधी कसा आला?' असा सवाल भुमरे यांनी उपस्थित केला आहे.

युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला बांगर समर्थकाची शिवीगाळ, ठाकरेंकडून स्वतः फोन करुन धीर

'...तेव्हा एकनाथ शिंदेंनी पोलीस अधिकाऱ्याला दम दिला'

बंड करत एकनाथ शिंदे हे सुरतला निघाले तेव्हा त्यांना अडवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. ट्राफिक जाम करून एकनाथ शिंदे आणि आम्हाला अडवण्यात आलं. कारण उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना आम्हाला गुजरातला जाऊ द्यायचं नव्हतं. त्यावेळी शिंदे यांनी एसीपीला फोन करून दम दिला होता,' असं म्हणत संदिपान भुमरे यांनी बंडखोरीचा किस्सा सांगितला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज