अ‍ॅपशहर

ट्रक चालकांची परवड; रस्त्याने ना ढाबा, ना चहाची सोय

ट्रक चालकांची होणारी परवड पाहता राज्य वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील आंतरराज्यीय चेक पॉईंटवर चालकांना खिचडी दिली जात आहे. लॉकडाऊनमुळे ट्रक चालक हजारो किमीचा प्रवास अन्न-पाण्याविना करत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2020, 2:30 pm
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळातही जीवनावश्यक आणि बिगर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करत ट्रक चालक जनजीवन सुरळीत ठेवत आहेत. पण या ट्रक चालकांना हजारो किमीचा प्रवास अन्नाविना करावा लागत असल्याचं चित्र आहे. कारण, रस्त्याने सर्व हॉटेल बंद आहेत. हेच लक्षात घेत मराठवाड्यातील सीमा चेक नाक्यांवर ट्रक चालकांसाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेर राज्यातून येणाऱ्या आणि परराज्यात जाणाऱ्या ट्रक चालकांना ही खिचडी दिली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rtos give free khichdi to truck drivers at inter state check posts
ट्रक चालकांची परवड; रस्त्याने ना ढाबा, ना चहाची सोय


१२ हजार ते एक लाख; मायदेशी येण्यासाठी असा आहे खर्च

मराठवाड्यात नांदेडमधील बिलोली आणि देगलूरमध्ये, तर उस्मानाबादमधील उमरग्यात चेक पॉईंट आहे. या चेक पॉईंटवर कर्नाटक आणि तेलंगणात ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. राज्य वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्याय माहितीनुसार, राज्यात २३ आंतरराज्यीय चेक पॉईंट आहेत. यापैकी तीन चेक पॉईंट मराठवाड्यातही आहेत. या चेक पॉईंटवर ट्रक चालकांना ताजी खिचडी देण्याचे आदेश देण्यात आल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं.

महाराष्ट्राची सीमा तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना लागून आहे. या सर्व राज्यातील वाहने विविध आंतरराज्यीय चेक पॉईंटवरुनच बाहेर पडतात. लॉकडाऊनमुळे या चेक पॉईंटवरील ट्राफिक १५ ते २० टक्क्यांनी कमी झाली आहे. पण मालवाहतूक करणारी वाहनं अजूनही सुरू आहेत. चालकांना या प्रवासाच्या काळात खाण्यासाठी काही मिळावं, असा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली. दिवसभर चालकांना ताजी तयार केलेली खिचडी दिली जात आहे.

ना पॅकेज, ना धोरण; लॉकडाउनच्या पद्धतीवर सोनिया गांधीची मोदी सरकारवर टीका

दरम्यान, २० एप्रिलपासूनच केंद्र सरकारने बिगर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही परवानगी दिली आहे. यासोबतच महामार्गावरील ढाबे आणि ट्रक गॅरेज सुरू करण्याचीही परवानगी देण्यात आली होती. पण ढाबे अजूनही सुरू झालेले नाहीत. त्यामुळे आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना हजारो किमीच्या प्रवासात साधा चहा पिण्याचीही व्यवस्था नाही. काही ठिकाणी पोलीस मदत करत आहेत. मात्र बहुतांश चालकांना, अन्न आणि पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज