म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने सुरक्षारक्षकांचे प्रस्तावित वेतन निश्चित केले असून, त्यात शासनाच्या आदेशानुसार विशेष भत्ता म्हणून आता महागाई भत्त्याचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे पगारात सरासरी सात हजारांची वाढ होणार आहे.
राज्यातील खासगी सुरक्षारक्षकांच्या नोकरीचे नियमन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमन १९८१ लागू करण्यात आले आहे. अधिनियमाच्या कलम १५ (१) अनुसार शासनाला सल्ला देण्यासाठी महाराष्ट्र खासगी सुरक्षा सल्लागार समितीची स्थापन करण्यात आली. समितीच्या २००६च्या निर्णयानुसार राज्यातील सरकारी, निमसरकारी क्षेत्र, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आदी ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमताना ते सरकारच्या खासगी सुरक्षारक्षक मंडळाकडूनच उपलब्ध करून घ्यावेत, असे बंधनकारक करण्यात आले आहे. औरंगाबादसह अन्य जिल्ह्यातही सुरक्षारक्षक मंडळाची स्थापन करण्यात आली असून, येथील मंडळाकडे एक हजार १६४ सुरक्षारक्षकांच्या नोंदी आहेत. मात्र, केवळ ५२६ जणांनाच काम करण्याची संधी मिळाली असून, तर अन्य चौकीदार कामाच्या प्रतीक्षेत आहेत. मंडळाकडे नोंदणी केलेल्या सुरक्षा रक्षकांना विशेष भत्ता, घरभाडे, वाहन भत्ता, धुलाई आदी मिळून दरमहा किमान १२ हजार वेतन दिले जाते. त्याचबरोबर लेव्ही, भविष्य निर्वाह निधी, दिवाळी बोनस, पगारी रजा, साप्ताहिक सुट्टी, राज्य कामगार विमा योजनेचे संरक्षण आदी लाभ दिले जातात. मंडळाने औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे प्रस्तावित वेतन निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यात मूळ वेतन, विशेष भत्ता, घरभाडे, धुलाई तसेच शैक्षणिक भत्ता मिळून सुरक्षारक्षकास १२ हजार ७९७ रुपये सध्या मिळतात. तर प्रस्तावित १४ हजार ५४७ रुपये आहे. तर सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी यांचे वेतन सध्या अनुक्रमे १३ हजार ३४३ आणि १३ हजार ९०० रुपये आहेत. त्यांना प्रस्तावित वेतन अनुक्रमे १५ हजार १९१ रुपये आणि १५ हजार ८४७ निश्चित केल्या गेले आहे. यासह लेव्हीवर मिळणाऱ्या लाभ अतिरिक्त असून त्यानुसार सुरक्षा रक्षकाचे प्रस्तावित वेतन १९ हजार ७६७, सुरक्षा पर्यवेक्षक २० हजार ६६९ आणि सुरक्षा अधिकारी २१ हजार ६१७ रुपये प्रस्तावित आहे.
\Bकाही जणांचा आक्षेप
\Bप्रस्तावित पगारवाढीस काही सुरक्षारक्षकांनी आक्षेप घेतला आहे. घरभाडे पाच ऐवजी दहा टक्के करा, धुलाई भत्ता तसेच वाहन भत्ता ६०० रुपये ऐवजी प्रत्येकी ८०० रुपये करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात कामगार उपायुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र पोळ यांच्याशी संपर्क साधला ते उपलब्ध झाले नाहीत.
\Bपदाचे नाव - सध्याचे वेतन - प्रस्तावित वाढ
\Bसुरक्षारक्षक - १२७९७ रुपये - १९७६७ रुपये
सुरक्षा पर्यवेक्षक -१३ हजार ३४३ - २०६६९
सुरक्षा अधिकारी - १३९०० रुपये - २१६१७ रुपये
जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने सुरक्षारक्षकांचे प्रस्तावित वेतन निश्चित केले असून, त्यात शासनाच्या आदेशानुसार विशेष भत्ता म्हणून आता महागाई भत्त्याचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे पगारात सरासरी सात हजारांची वाढ होणार आहे.
राज्यातील खासगी सुरक्षारक्षकांच्या नोकरीचे नियमन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमन १९८१ लागू करण्यात आले आहे. अधिनियमाच्या कलम १५ (१) अनुसार शासनाला सल्ला देण्यासाठी महाराष्ट्र खासगी सुरक्षा सल्लागार समितीची स्थापन करण्यात आली. समितीच्या २००६च्या निर्णयानुसार राज्यातील सरकारी, निमसरकारी क्षेत्र, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आदी ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमताना ते सरकारच्या खासगी सुरक्षारक्षक मंडळाकडूनच उपलब्ध करून घ्यावेत, असे बंधनकारक करण्यात आले आहे. औरंगाबादसह अन्य जिल्ह्यातही सुरक्षारक्षक मंडळाची स्थापन करण्यात आली असून, येथील मंडळाकडे एक हजार १६४ सुरक्षारक्षकांच्या नोंदी आहेत. मात्र, केवळ ५२६ जणांनाच काम करण्याची संधी मिळाली असून, तर अन्य चौकीदार कामाच्या प्रतीक्षेत आहेत. मंडळाकडे नोंदणी केलेल्या सुरक्षा रक्षकांना विशेष भत्ता, घरभाडे, वाहन भत्ता, धुलाई आदी मिळून दरमहा किमान १२ हजार वेतन दिले जाते. त्याचबरोबर लेव्ही, भविष्य निर्वाह निधी, दिवाळी बोनस, पगारी रजा, साप्ताहिक सुट्टी, राज्य कामगार विमा योजनेचे संरक्षण आदी लाभ दिले जातात. मंडळाने औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे प्रस्तावित वेतन निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यात मूळ वेतन, विशेष भत्ता, घरभाडे, धुलाई तसेच शैक्षणिक भत्ता मिळून सुरक्षारक्षकास १२ हजार ७९७ रुपये सध्या मिळतात. तर प्रस्तावित १४ हजार ५४७ रुपये आहे. तर सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी यांचे वेतन सध्या अनुक्रमे १३ हजार ३४३ आणि १३ हजार ९०० रुपये आहेत. त्यांना प्रस्तावित वेतन अनुक्रमे १५ हजार १९१ रुपये आणि १५ हजार ८४७ निश्चित केल्या गेले आहे. यासह लेव्हीवर मिळणाऱ्या लाभ अतिरिक्त असून त्यानुसार सुरक्षा रक्षकाचे प्रस्तावित वेतन १९ हजार ७६७, सुरक्षा पर्यवेक्षक २० हजार ६६९ आणि सुरक्षा अधिकारी २१ हजार ६१७ रुपये प्रस्तावित आहे.
\Bकाही जणांचा आक्षेप
\Bप्रस्तावित पगारवाढीस काही सुरक्षारक्षकांनी आक्षेप घेतला आहे. घरभाडे पाच ऐवजी दहा टक्के करा, धुलाई भत्ता तसेच वाहन भत्ता ६०० रुपये ऐवजी प्रत्येकी ८०० रुपये करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात कामगार उपायुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र पोळ यांच्याशी संपर्क साधला ते उपलब्ध झाले नाहीत.
\Bपदाचे नाव - सध्याचे वेतन - प्रस्तावित वाढ
\Bसुरक्षारक्षक - १२७९७ रुपये - १९७६७ रुपये
सुरक्षा पर्यवेक्षक -१३ हजार ३४३ - २०६६९
सुरक्षा अधिकारी - १३९०० रुपये - २१६१७ रुपये