औरंगाबाद : जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन, पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नाहीत. औरंगाबाद येथील प्रशासकीय यंत्रणेला जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी (२८ मे) मुंबईतील आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगर अध्यक्ष बाबासाहेब दाभाडे, राम भगुरे, राजेंद्र पाटील, रवी वहाटुळे, रेणुका सोमवंशी, रेखा वहाटुळे, वैशाली खोपडे आदींसह कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस राहुल भोसले यांनी कळविले आहे.
संभाजी ब्रिगेडचे सोमवारी मुंबईत उपोषण
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन, पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नाहीत...
Maharashtra Times 26 May 2018, 4:00 am