म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
दुष्काळातून माहेर मुक्त व्हावे यासाठी दीपाली इखे यांनी पाणी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणाची प्रेरणा घेतली. 'माझे माहेर दुष्काळमुक्त करणार,' अशी शपथ त्यांनी ग्रामस्थांसोबत घेतली. अजिंठा येथील दीपाली संजय इखे या पुण्यात व्यावसायिक आहेत.
व्यवसाय सांभाळत समाजासाठी काही देणे लागतो या हेतूने त्यांनी सत्यजित भटकळ यांची नुकतीच भेट घेतली. माहेर असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा गावाची निवड करून अजिंठ्यासह पुढील काही महिन्यात सिल्लोड तालुक्यातील १३१ गावात त्या जनजागृती करणार आहेत. याची सुरुवात अजिंठा येथे 'दुष्काळाशी दोन हात', 'पाणलोट नियोजन' हे लघुपट दाखवून केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी इखे यांनी मार्गदर्शन केले. त्यांना पती संजय इखे, वडील माधवराव साठे, विजय पगारे यांनी मदत केली.
\Bस्वयंस्वेवकांचे प्रशिक्षण \B
या मोहिमेअंतर्गत दीपाली इखे या पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपणावर जनजागृती करणार आहेत. प्रत्येक गावातील पाच जणांची निवड करून त्यांना पाणी फाउंडेशनच्या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेत गावांना सहभागी होता येणार आहे.