म. टा. प्रतिनिधी, सातारा
येथील संभाजी चौक ते अहल्यादेवी होळकर चौक या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे हा रस्ता नसून, अडथळ्यांचा मार्ग बनला आहे. विशेष म्हणजे सातारा प्रभाग कार्यालयाकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. गेल्या वर्षी मुरूम टाकून खड्डे बुजवलेले खड्डे नुकत्याच झालेल्या पावसाने उघडे पडले आहेत.
या रस्त्याचे २०१२ मध्ये जिल्हा परिषदेमार्फत डांबरीकरण झाले होते. सातारा गाव, तांडा, श्री विसर्जन विहीर, मनपा प्रभाग कार्यालय, भारत बटालियन, इंजिनीअरिंग कालेज, खंडोबा मंदिर, जिल्हा परिषध शाळा आदींना जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे सर्वात जास्त रहदारी याच रस्त्यावरून होते. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. एकता कालनीजवळील पुलावर नेहमी पाणी साचते. त्यामुळे स्कूल बस, बटालियनची वाहने व गावकऱ्यांना जाताना कसरत करावी लागते. श्रीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी याच मार्गावरून जावे लागते. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अनेक वाहनस्वार घसरून पडण्याच्या घटना घडतात. गेल्या वर्षी मनपाने खड्डे बुजवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात मुरूम टाकला. परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने तो वाहून केला. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे अवघड झाले आहे. विद्याथ्यांना शाळेत सोडणे पालकांना अवघड झाले आहे.
-राहुल शिंदे
रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजलाइन गेलेली आहे. तसेच वाहतुकीला अडथळा करणारे महावितरणचे खांबही आहेत. दोन्ही तातडीने हललावेत.
-रमेश बाहुले
पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अपघात होतात. तसेच दुर्गंधी पसरून आजारांनाही निमंत्रण मिळते. रस्ता मोठा करावा.
-सोमीनाथ शिराणे
या रस्त्याच्या डांबरीकरणाचे इस्टिमेट तयार करून निविदा काढण्यासाठी दिलेले आहे. ते मंजूर झाले की डांबरीकरण करण्यात येईल.
-पी. जी. पवार, वार्ड अभियंता, मनपा
येथील संभाजी चौक ते अहल्यादेवी होळकर चौक या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे हा रस्ता नसून, अडथळ्यांचा मार्ग बनला आहे. विशेष म्हणजे सातारा प्रभाग कार्यालयाकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. गेल्या वर्षी मुरूम टाकून खड्डे बुजवलेले खड्डे नुकत्याच झालेल्या पावसाने उघडे पडले आहेत.
या रस्त्याचे २०१२ मध्ये जिल्हा परिषदेमार्फत डांबरीकरण झाले होते. सातारा गाव, तांडा, श्री विसर्जन विहीर, मनपा प्रभाग कार्यालय, भारत बटालियन, इंजिनीअरिंग कालेज, खंडोबा मंदिर, जिल्हा परिषध शाळा आदींना जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे सर्वात जास्त रहदारी याच रस्त्यावरून होते. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. एकता कालनीजवळील पुलावर नेहमी पाणी साचते. त्यामुळे स्कूल बस, बटालियनची वाहने व गावकऱ्यांना जाताना कसरत करावी लागते. श्रीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी याच मार्गावरून जावे लागते. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अनेक वाहनस्वार घसरून पडण्याच्या घटना घडतात. गेल्या वर्षी मनपाने खड्डे बुजवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात मुरूम टाकला. परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने तो वाहून केला. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे अवघड झाले आहे. विद्याथ्यांना शाळेत सोडणे पालकांना अवघड झाले आहे.
-राहुल शिंदे
रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजलाइन गेलेली आहे. तसेच वाहतुकीला अडथळा करणारे महावितरणचे खांबही आहेत. दोन्ही तातडीने हललावेत.
-रमेश बाहुले
पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अपघात होतात. तसेच दुर्गंधी पसरून आजारांनाही निमंत्रण मिळते. रस्ता मोठा करावा.
-सोमीनाथ शिराणे
या रस्त्याच्या डांबरीकरणाचे इस्टिमेट तयार करून निविदा काढण्यासाठी दिलेले आहे. ते मंजूर झाले की डांबरीकरण करण्यात येईल.
-पी. जी. पवार, वार्ड अभियंता, मनपा