म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) प्रश्नपत्रिकांमध्ये शुद्धलेखनाच्या झालेल्या चुकांची विषयतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. राज्य परीक्षा परिषदेने यासंदर्भात सोमवारी तातडीची बैठकही बोलावली आहे. प्रश्नपत्रिकेतील चुका का, राहिल्या याची छाननी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील परीक्षार्थींचे निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शनिवारी ‘टीईटी’ परीक्षा झाली. राज्यभरात एक हजार १८ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात झाली. दोन लाख ९७ हजार ६७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पेपर-१ सकाळी साडेदहा ते दुपारी एक, तर पेपर-२ दुपारी दोन ते पाचदरम्यान घेण्यात आला. परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील शुद्धलेखनाच्या चुकांनी परीक्षार्थींची परीक्षा पाहिली. एका प्रश्नपित्रकेत सुमारे ५०पेक्षा अधिक चुका राहिल्या. काही शब्द बदलल्याने वाक्याचा अर्थच बदलून गेला. त्यामुळे नेमका कोणता प्रश्न अपेक्षित होता, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या गोंधळामुळे परीक्षार्थींना मनस्ताप आणि वेळही गेला.
या प्रकरणाची परिषदेने दखल घेतली असून, तातडीने याबाबत विषयतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. कोणत्या प्रश्नांमध्ये चुका राहिल्या, शुद्धलेखनाच्या चुका कोणामुळे राहिल्या या सगळ्या बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी परिषदेने विषयतज्ज्ञांना सोमवारी बोलावले आहे. टीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत असा गोंधळ उडाल्याने डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे.
चारही प्रश्नपित्रका संचात चुका
‘टीईटी’ परीक्षेत पहिल्यांदाच बहुसंची प्रश्नपत्रिकांचे संच वापरण्यात आले. ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे प्रश्नपत्रिकांचे संच होती. प्रश्नपित्रकेतील शुद्धलेखनाच्या चुका एका प्रश्नप्रत्रिकेपुरत्या मर्यादित नव्हत्या, तर चारही प्रश्नपत्रिकेतील चुका होत्या. सगळ्याच प्रश्नसंचामध्ये चुका राहिल्याने याप्रकरणी परिषद नेमकी काय भूमिका घेते याकडे परीक्षार्थीचे लक्ष लागले आहे.
तज्ज्ञांसह परीक्षार्थींचेही मते विचारात घेणार
प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत विषयतज्ज्ञांकडून छाननी केली जाणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर विषयतज्ज्ञ अहवाल सादर करतील. त्याचवेळी उत्तरसूचीवर किंवा परीक्षार्थींकडून तक्रारी आल्यानंतर त्यांची मते ही विचारात घेतली जाणार आहे. तज्ज्ञ आणि परीक्षार्थींची मते जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत सोमवारी तातडीने तज्ज्ञांना बोलाविण्यात आले आहे. प्रश्नपत्रिकांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर परीक्षार्थींचेही विचारात घेतली जातील. त्यानंर काय करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. लगेच निर्णयाबाबत सांगणे उचित ठरणार नाही.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद, पुणे.
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) प्रश्नपत्रिकांमध्ये शुद्धलेखनाच्या झालेल्या चुकांची विषयतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. राज्य परीक्षा परिषदेने यासंदर्भात सोमवारी तातडीची बैठकही बोलावली आहे. प्रश्नपत्रिकेतील चुका का, राहिल्या याची छाननी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील परीक्षार्थींचे निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शनिवारी ‘टीईटी’ परीक्षा झाली. राज्यभरात एक हजार १८ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात झाली. दोन लाख ९७ हजार ६७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पेपर-१ सकाळी साडेदहा ते दुपारी एक, तर पेपर-२ दुपारी दोन ते पाचदरम्यान घेण्यात आला. परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील शुद्धलेखनाच्या चुकांनी परीक्षार्थींची परीक्षा पाहिली. एका प्रश्नपित्रकेत सुमारे ५०पेक्षा अधिक चुका राहिल्या. काही शब्द बदलल्याने वाक्याचा अर्थच बदलून गेला. त्यामुळे नेमका कोणता प्रश्न अपेक्षित होता, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या गोंधळामुळे परीक्षार्थींना मनस्ताप आणि वेळही गेला.
या प्रकरणाची परिषदेने दखल घेतली असून, तातडीने याबाबत विषयतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. कोणत्या प्रश्नांमध्ये चुका राहिल्या, शुद्धलेखनाच्या चुका कोणामुळे राहिल्या या सगळ्या बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी परिषदेने विषयतज्ज्ञांना सोमवारी बोलावले आहे. टीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत असा गोंधळ उडाल्याने डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे.
चारही प्रश्नपित्रका संचात चुका
‘टीईटी’ परीक्षेत पहिल्यांदाच बहुसंची प्रश्नपत्रिकांचे संच वापरण्यात आले. ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे प्रश्नपत्रिकांचे संच होती. प्रश्नपित्रकेतील शुद्धलेखनाच्या चुका एका प्रश्नप्रत्रिकेपुरत्या मर्यादित नव्हत्या, तर चारही प्रश्नपत्रिकेतील चुका होत्या. सगळ्याच प्रश्नसंचामध्ये चुका राहिल्याने याप्रकरणी परिषद नेमकी काय भूमिका घेते याकडे परीक्षार्थीचे लक्ष लागले आहे.
तज्ज्ञांसह परीक्षार्थींचेही मते विचारात घेणार
प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत विषयतज्ज्ञांकडून छाननी केली जाणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर विषयतज्ज्ञ अहवाल सादर करतील. त्याचवेळी उत्तरसूचीवर किंवा परीक्षार्थींकडून तक्रारी आल्यानंतर त्यांची मते ही विचारात घेतली जाणार आहे. तज्ज्ञ आणि परीक्षार्थींची मते जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत सोमवारी तातडीने तज्ज्ञांना बोलाविण्यात आले आहे. प्रश्नपत्रिकांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर परीक्षार्थींचेही विचारात घेतली जातील. त्यानंर काय करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. लगेच निर्णयाबाबत सांगणे उचित ठरणार नाही.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद, पुणे.