म. टा. प्रतिनिधी, पैठण
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे नुकसान झाल्याने पैठण तालुक्यातील नांदर येथील ३५ वर्षांच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ज्ञानेश्वर गणपत व्यवहारे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, बोंडअळीमुळे आठ दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील ही दुसरी आत्महत्या आहे.
ज्ञानेश्वर व्यवहारे यांनी उसनवारी करून त्यांच्या नांदर शिवारातील दोन एकर शेतीत कापसाची लागवड केली होती. कापसाचे बोंडअळीमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त होते. शेतात चाललो, असे म्हणून रविवारी सकाळी घरातून गेलेल्या ज्ञानेश्वर व्यवहारे घरी परत आले नाहीत, म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली. सोमवारी शेख निजाम यांच्या शेतातील विहिरित व्यवहारे यांचा मृतदेह तरंगत असताना निजाम यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी ज्ञानेश्वर व्यवहारे यांच्या मागे वडील, आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी अशा परिवार आहे. दरम्यान, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने गेल्या आठ दिवसांत ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. खंडाला येथील महिला शेतकरी आशा बबन गिरी यांनी १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती.
तुर्काबादेत शेतकऱ्याची आत्महत्या
वाळूजमहानगर : गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद येथे शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन मंगळवार (२३ जानेवारी) पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब सूर्यभान रहाटवाड (४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तुर्काबाद शिवारात त्यांची चार एकर शेती आहे. शेतीचे उत्पन्न कमी झाल्याने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. या प्रकाराची माहिती वाळूज पोलीसाना मिळाली असता, त्यांनी घटनास्थळी येऊन बाबासाहेब यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय साठे हे करत आहेत.
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे नुकसान झाल्याने पैठण तालुक्यातील नांदर येथील ३५ वर्षांच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ज्ञानेश्वर गणपत व्यवहारे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, बोंडअळीमुळे आठ दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील ही दुसरी आत्महत्या आहे.
ज्ञानेश्वर व्यवहारे यांनी उसनवारी करून त्यांच्या नांदर शिवारातील दोन एकर शेतीत कापसाची लागवड केली होती. कापसाचे बोंडअळीमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त होते. शेतात चाललो, असे म्हणून रविवारी सकाळी घरातून गेलेल्या ज्ञानेश्वर व्यवहारे घरी परत आले नाहीत, म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली. सोमवारी शेख निजाम यांच्या शेतातील विहिरित व्यवहारे यांचा मृतदेह तरंगत असताना निजाम यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी ज्ञानेश्वर व्यवहारे यांच्या मागे वडील, आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी अशा परिवार आहे. दरम्यान, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने गेल्या आठ दिवसांत ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. खंडाला येथील महिला शेतकरी आशा बबन गिरी यांनी १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती.
तुर्काबादेत शेतकऱ्याची आत्महत्या
वाळूजमहानगर : गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद येथे शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन मंगळवार (२३ जानेवारी) पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब सूर्यभान रहाटवाड (४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तुर्काबाद शिवारात त्यांची चार एकर शेती आहे. शेतीचे उत्पन्न कमी झाल्याने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. या प्रकाराची माहिती वाळूज पोलीसाना मिळाली असता, त्यांनी घटनास्थळी येऊन बाबासाहेब यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय साठे हे करत आहेत.