अ‍ॅपशहर

शिवसेनेचा मोर्चा; इंटरनेट सेवा बंद

शिवसेनेने शनिवारी दंगलप्रकरणी पोलिस आणि समाजकंटकाविरुद्ध हिंदू शक्ती मोर्चाचे आयोजन केले होते. त्यामुळे सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान शहरातील मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

Maharashtra Times 20 May 2018, 8:15 am
औरंगाबाद :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad-morcha


शिवसेनेने शनिवारी दंगलप्रकरणी पोलिस आणि समाजकंटकाविरुद्ध हिंदू शक्ती मोर्चाचे आयोजन केले होते. त्यामुळे सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान शहरातील मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मोर्चापूर्वीच अचानक इंटरनेट सेवा बंद केल्याने

अफवांचे पेव फुटले होते. शहरात काही पुन्हा घडले का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता. यामुळे अनेक मोबाइल ग्राहकांनी थेट संबंधित लोकांना फोन करून मोर्चात काही घडले आहे का, अशी विचारणा केली. याबाबत संबंधीत मोबाइल कंपन्याच्या प्रतिनिधींना विचारले असता तांत्रिक कारणांमुळे इंटरनेट सेवा बंद असल्याचे स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज