औरंगाबाद : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. या बंडखोर आमदारांना इशारा देण्यासाठी आज क्रांतिचौक येथे शिवसेनेच्यावतीने निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना संपली अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या बंडखोर आमदारांना इशारा देण्यासाठी व औरंगाबादेतील शिवसेनेला कुठलाही धक्का लागला नाही हे दाखविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज क्रांतिचौक येथे निदर्शने करण्यात आली.
या वेळी बंडखोर आमदार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख अंबादास दानवे,माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैध, बाडू थोरात, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप,सुनीता आहुलवार आदीं उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना संपली अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या बंडखोर आमदारांना इशारा देण्यासाठी व औरंगाबादेतील शिवसेनेला कुठलाही धक्का लागला नाही हे दाखविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज क्रांतिचौक येथे निदर्शने करण्यात आली.
या वेळी बंडखोर आमदार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख अंबादास दानवे,माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैध, बाडू थोरात, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप,सुनीता आहुलवार आदीं उपस्थित होते.