अ‍ॅपशहर

शिवसेनेचा पाठिंबा धोरणात्मक

शिवसेना आमचा जुना मित्रपक्ष आहे. त्यांनी एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना दिलेला पाठिंबा हा धोरणात्मक निर्णय आहे, यात कोणत्याही प्रकाराची तडजोड नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी ‘मटा’शी बोलताना केला. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व आमदार, मंत्री आदींचा चांगला परफार्मन्स होता. त्यामुळे तूर्तास मंत्रिमंडळात फेरबदल किंवा विस्तार होणार नाही. योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Times 24 Jun 2017, 3:00 am
Ravindra.Taksal@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsenas backing policy danwe on president election
शिवसेनेचा पाठिंबा धोरणात्मक

Tweet : @rtaksalMT
औरंगाबाद ः शिवसेना आमचा जुना मित्रपक्ष आहे. त्यांनी एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना दिलेला पाठिंबा हा धोरणात्मक निर्णय आहे, यात कोणत्याही प्रकाराची तडजोड नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी ‘मटा’शी बोलताना केला. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व आमदार, मंत्री आदींचा चांगला परफार्मन्स होता. त्यामुळे तूर्तास मंत्रिमंडळात फेरबदल किंवा विस्तार होणार नाही. योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विस्तारक योजनेच्या आढावा बैठकीनिमित्त प्रदेशाध्यक्ष दानवे शहरात आले असता त्यांनी विविध विषयांवर ‘मटा’शी संवाद साधला. एनडीएतर्फे जाहीर झालेल्या रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपत‌िपदाच्या उमेदवारीला शिवसेनेने सोमवारी जाहीर विरोध दर्शविला. त्यानंतर २४ तास उलटण्याच्या आतच घूमजाव करून कोंविंद यांना
पाठिंबा देताना, ‘भाजप चुकत असेल, तर विरोध करणार. उगाच विरोधाला विरोध करणार नाही,’ असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले होते. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी, ‘शिवसेना एनडीएचा जुना मित्रपक्ष आहे. विधानसभा व जिल्हा परिषद वगळता बहुतेक निवडणुका युती म्हणून एकत्र लढल्या आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दोनदा बैठक झाल्या. मुंबईतही अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. शिवसेनेने पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा धोरणात्मक आहे. त्यात कोणतीही तडजोड झालेली नाही,’ असा दावा केला.

पक्षविस्तारावर भर, मंत्रिमंडळ विस्तार नंतर
मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी चर्चा अधूनमधून होत असते. त्यावर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी, जिल्हा परिषद, पंचायत तसेच महापालिका निवडणुकीत मंत्री, आमदार, पदाधिकारी साऱ्यांच कार्यकर्त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला. त्यामुळे तूर्तास मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकाराचे फेरबदल किंवा विस्तारची शक्यता नाही. सध्या पक्षविस्तारावर भर आहे. सरकार मजबूत आहे. त्यामुळे मध्यवधी निवडणूक होईल, अशा केवळ वावड्या आहेत. अर्थात, सैनिक जसा रोज सराव करत असतो, त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनीही नेहमी सज्ज राहिले पाहिजे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज