अ‍ॅपशहर

मोफत अंत्यसंस्काराचे सहा लाख थकित

म टा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2019, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोफत अंत्यसंस्कार योजनेचे सहा लाख रुपये महापालिका प्रशासनाने थकवल्यामुळे ही रक्कम मिळेपर्यंत मोफत अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशारा स्मशानजोगींनी सोमवारी महापौरांनी भेट घेऊन दिला. येत्या दोन-तीन दिवसांत मार्ग काढण्याचे आश्वासन महापौरांनी नंदकुमार घोडले यांनी दिले.

शहरात ३५ स्मशानभूमी असून त्यात रोज सरासरी १५ ते २० अंत्यसंस्कार होतात. मोफत अंत्यसंस्काराचे प्रमाण आठ ते दहाच्या घरात असते. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींसाठी किंवा नगरसेवकाने शिफारस केलेल्यांसाठी ही योजना राबवली जाते. स्मशानजोगी समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १८ सप्टेबर २०१९ रोजी सुरू केलेली मोफत अंत्यसंस्कार योजना सर्व स्मशानजोगी प्रामाणिकपणे राबवत आहेत. योजना सुरू होवून दोन महिने झाले असून दोन महिन्यांचा खर्च पालिका प्रशासनाने अद्याप दिलेला नाही. स्मशानजोगींनी स्वत:चे पैसे खर्च करून, प्रसंगी उधारीतून अंत्यसंस्कारासाठी साहित्य आणले. योजनेचे पैसे दिले नाहीत, तर मोफत अंत्यसंस्कार करणे बंद करू, असा इशारा दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज